शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा कायमची बंद होण्यापासून वाचली...

By साईनाथ कुचनकार | Updated: May 4, 2023 16:09 IST

पटसंख्या वाढली, पाचवीला ३५ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : मागील शैक्षणिक सत्रात पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून येथून जवळच असलेले विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचा फतवा जिल्हा परिषद प्रशासनाने काढला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शाळा बंद न करण्यासाठी आंदोलन केले होते. चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जोरदार प्रयत्न केले. दरम्यान, पाचवीच्या वर्गात तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पटसंख्या वाढल्यामुळे येथील शाळा बंद होण्यापासून वाचली.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मागील शैक्षणिक सत्रात वर्ग पाचवी ते दहावीत केवळ २२ विद्यार्थी शैक्षणिक धडे गिरवत होते. त्यामुळे अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा बंद करण्याचा फतवा काढला. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला तसेच जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. जिल्हा परिषद हायस्कूलमधील पटसंख्या वाढविण्याची संधी मागितली. तेव्हापासून ग्रामपंचायतीमार्फत ज्यांचे पाल्य चौथ्या वर्गात होते, त्या पालकांची पालक सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती विभाग व टेकडी विभागात घेतली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालकांचे समुपदेशन केले. जिल्हा परिषद हायस्कूल नियमित सुरू राहिले पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याला गावातूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्हा परिषद हायस्कूल, विसापूरमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, सुरेखा इटणकर, विद्या देवाळकर आदींचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

सैनिक स्कूलमधील मयंक रवींद्र कांबळे याने वर्ग सहावी, बल्लारपूर जनता विद्यालयातील आर्यन मच्छिंद्र कुळमेथे याने वर्ग आठवी, बल्लारपूर दिलासाग्राम कॉन्व्हेंटमधील वेदांत दिनकर डाहुले याने वर्ग आठवी, पटेल हायस्कूल, चंद्रपूरमधील सम्यक सुनील पुणेकर याने वर्ग सहावीमध्ये प्रवेश घेऊन शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविला. आता विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षण आवडत असल्याने पालकदेखील आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSchoolशाळा