शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

ग्रामस्थांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा कायमची बंद होण्यापासून वाचली...

By साईनाथ कुचनकार | Updated: May 4, 2023 16:09 IST

पटसंख्या वाढली, पाचवीला ३५ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : मागील शैक्षणिक सत्रात पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून येथून जवळच असलेले विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचा फतवा जिल्हा परिषद प्रशासनाने काढला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शाळा बंद न करण्यासाठी आंदोलन केले होते. चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जोरदार प्रयत्न केले. दरम्यान, पाचवीच्या वर्गात तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पटसंख्या वाढल्यामुळे येथील शाळा बंद होण्यापासून वाचली.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मागील शैक्षणिक सत्रात वर्ग पाचवी ते दहावीत केवळ २२ विद्यार्थी शैक्षणिक धडे गिरवत होते. त्यामुळे अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा बंद करण्याचा फतवा काढला. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला तसेच जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. जिल्हा परिषद हायस्कूलमधील पटसंख्या वाढविण्याची संधी मागितली. तेव्हापासून ग्रामपंचायतीमार्फत ज्यांचे पाल्य चौथ्या वर्गात होते, त्या पालकांची पालक सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती विभाग व टेकडी विभागात घेतली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालकांचे समुपदेशन केले. जिल्हा परिषद हायस्कूल नियमित सुरू राहिले पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याला गावातूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्हा परिषद हायस्कूल, विसापूरमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, सुरेखा इटणकर, विद्या देवाळकर आदींचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

सैनिक स्कूलमधील मयंक रवींद्र कांबळे याने वर्ग सहावी, बल्लारपूर जनता विद्यालयातील आर्यन मच्छिंद्र कुळमेथे याने वर्ग आठवी, बल्लारपूर दिलासाग्राम कॉन्व्हेंटमधील वेदांत दिनकर डाहुले याने वर्ग आठवी, पटेल हायस्कूल, चंद्रपूरमधील सम्यक सुनील पुणेकर याने वर्ग सहावीमध्ये प्रवेश घेऊन शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविला. आता विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षण आवडत असल्याने पालकदेखील आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSchoolशाळा