शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गोंदिया - चंद्रपूर रेल्वेमार्गाच्या डबललाइनचे काम रखडलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:36 IST

Chandrapur : आणखी किती दिवस करावी लागणार प्रवाशांना प्रतीक्षा

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : दोन वर्षांपूर्वी गोंदिया- नागभीड चंद्रपूर या रेल्वेमार्गाच्या डबललाइनच्या कामाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मात्र लाइनच्या विस्ताराची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे प्रवाशांना या डबललाइनच्या कामाची अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

७ जानेवारी २०२३ रोजी रेल्वेचे वरिष्ठ मंडल प्रबंधक मनिंदर उपल यांनी नागभीड जंक्शनला भेट दिली होती. तेव्हा पदाधिकारी आणि पत्रकार यांच्याशी अनौपचारिक चर्चा करताना डबललाइनच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती दिली होती. 

गोंदिया-बल्लारशाह हा जवळजवळ २५० किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग आहे. सध्या या मार्गावर अनेक प्रवासी गाड्यांचे अवागमन सुरू आहे. अनेक एक्सप्रेस गाड्याही या मार्गावर सुरू आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांतील रेल्वेची अनेक स्थानके या मार्गावर असून रोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. या मार्गाने केवळ प्रवासी गाड्याच नाही तर भोपाळ, इंदोर, भिलाई, शालीमार, सिकंदराबाद येथून मोठ्या प्रमाणावर मालगाड्या जात व येत आहेत. गोंदिया बल्लारशाह या रेल्वे मार्गावर दिवसभरातून २५ ते ३० मालगाड्या धावत असल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या चांगल्याच प्रभावित 9000 झाल्या आहेत. या मालगाड्यांमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या दोन ते तीन तास उशिरा धावत आहेत. एखादी मालगाडी एक दीड तासांनी सुटणार असेल तर एक्सप्रेस गाडी व पॅसेंजर गाडीला आहे त्याच ठिकाणी थांबविले जाते आणि प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. 

तर अनेक समस्या सुटतील असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वेने या मार्गावर डबल लाइन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या तरी या मार्गावरील डबल लाइनच्या सर्वेक्षणानंतर डबल लाइनच्या विस्ताराची कोणतीही हालचाल दिसत नाही. या मार्गावर रेल्वेची डबललाइन झाली तर अनेक समस्या निकाली निघणार आहेत. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या समस्येला वाचा फोडावी अशी मागणी केली जात आहे.

"खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या भागाचा दौरा करीत असताना अनेक कार्यकर्त्यांनी या समस्येचा पाढा वाचला आहे. लवकरच मी गोंदिया-बल्लारशा या डबल लाइनच्या कामाची माहिती घेणार आहे आणि पुढील पाठपुरावा करणार आहे."- डॉ. नामदेव किरसान, खासदार, गडचिरोली चिमूर 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरrailwayरेल्वे