शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

भरतीचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवाराचा नोकरीचा मार्ग मोकळा!

By राजेश मडावी | Updated: January 30, 2024 17:44 IST

अखेर मंत्रालयातून धडकला आदेश; नोकर भरती प्रक्रियेतील तिढा सुटला : कार्यवाही करणाऱ्या वनाधिकाऱ्यांचा संभ्रम दूर.

चंद्रपूर : वन विभागातील भरतीसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक मूल्यमापन सुरू असताना तृतीयपंथी उमेदवार समोर आल्याने अपात्र ठरणार काय, असा प्रश्न निर्माण झाला. भरती प्रक्रियेची कार्यवाही करणारे वन विभागाचे अधिकारीही पेचात सापडले. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. अखेर सोमवारी (दि. २९) राज्य शासनाच्या सचिवालयातून तृतीयपंथी उमेदवारांच्या मूल्यमापनाबाबत सूचना आल्या. ही माहिती तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ‘त्या’ उमेदवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

वन विभागाच्या वतीने विविध पदांसाठी सध्या चंद्रपुरात भरती प्रक्रिया सुरू आहे. लेखी परीक्षेमध्ये ४५ पेक्षा अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचे मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक क्षमतेची मोजणी केली जात आहे. शारीरिक क्षमतेचे मोजमाप सुरू असताना पात्र उमेदवार म्हणून तृतीयपंथी उमेदवार समोर आला. या उमेदवाराची वर्गवारी कशी करावी, याकरिता संपूर्ण भरती प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी संभ्रमात सापडले होते. तृतीयपंथी उमेदवाराला ४५ पेक्षा अधिक गुण असल्याने त्याला परत केल्यास त्याच्यावर अन्याय होईल. उमेदवाराने याबाबत तक्रार केल्यास अंगलट येईल, या धास्तीने भरती कार्यवाही राबविणाऱ्या पथकाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला.

नेमके घडले काय ?

त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्याच्या वनविभागाच्या सचिवांनी तृतीयपंथी उमेदवारांबाबत आदेश जारी केला. तृतीयपंथी उमेदवारांनी स्त्री व पुरुष संदर्भात स्वत:कडील सर्व कागदपत्रे सादर केली. त्यानुसार, त्याची शहानिशा करून त्या संवर्गामधून त्याची चाचणी घेण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे पेच दूर झाला. तृतीयपंथी संवर्गातून एकच उमेदवार होता व एकच जागा तृतीयपंथी उमेदवारासाठी राखीव आहे. मंत्रालयातील आदेशानुसार, भरत प्रक्रियेची कार्यवाही झाल्याने तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय