शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

भरतीचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवाराचा नोकरीचा मार्ग मोकळा!

By राजेश मडावी | Updated: January 30, 2024 17:44 IST

अखेर मंत्रालयातून धडकला आदेश; नोकर भरती प्रक्रियेतील तिढा सुटला : कार्यवाही करणाऱ्या वनाधिकाऱ्यांचा संभ्रम दूर.

चंद्रपूर : वन विभागातील भरतीसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक मूल्यमापन सुरू असताना तृतीयपंथी उमेदवार समोर आल्याने अपात्र ठरणार काय, असा प्रश्न निर्माण झाला. भरती प्रक्रियेची कार्यवाही करणारे वन विभागाचे अधिकारीही पेचात सापडले. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. अखेर सोमवारी (दि. २९) राज्य शासनाच्या सचिवालयातून तृतीयपंथी उमेदवारांच्या मूल्यमापनाबाबत सूचना आल्या. ही माहिती तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ‘त्या’ उमेदवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

वन विभागाच्या वतीने विविध पदांसाठी सध्या चंद्रपुरात भरती प्रक्रिया सुरू आहे. लेखी परीक्षेमध्ये ४५ पेक्षा अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचे मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक क्षमतेची मोजणी केली जात आहे. शारीरिक क्षमतेचे मोजमाप सुरू असताना पात्र उमेदवार म्हणून तृतीयपंथी उमेदवार समोर आला. या उमेदवाराची वर्गवारी कशी करावी, याकरिता संपूर्ण भरती प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी संभ्रमात सापडले होते. तृतीयपंथी उमेदवाराला ४५ पेक्षा अधिक गुण असल्याने त्याला परत केल्यास त्याच्यावर अन्याय होईल. उमेदवाराने याबाबत तक्रार केल्यास अंगलट येईल, या धास्तीने भरती कार्यवाही राबविणाऱ्या पथकाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला.

नेमके घडले काय ?

त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्याच्या वनविभागाच्या सचिवांनी तृतीयपंथी उमेदवारांबाबत आदेश जारी केला. तृतीयपंथी उमेदवारांनी स्त्री व पुरुष संदर्भात स्वत:कडील सर्व कागदपत्रे सादर केली. त्यानुसार, त्याची शहानिशा करून त्या संवर्गामधून त्याची चाचणी घेण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे पेच दूर झाला. तृतीयपंथी संवर्गातून एकच उमेदवार होता व एकच जागा तृतीयपंथी उमेदवारासाठी राखीव आहे. मंत्रालयातील आदेशानुसार, भरत प्रक्रियेची कार्यवाही झाल्याने तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय