शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अक्षम्य हलगर्जीमुळेच कोसळला रेल्वे ब्रीज, दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 08:32 IST

दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : रविवारी सायंकाळी बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे या भगदाडातून १७ प्रवासी खाली रेल्वे रुळावर पडून जखमी झाले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले. हा ब्रीज कोसळण्यामागे रेल्वे प्रशासनाची हलगर्जीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सकाळपासूनच नागपूरची टीम बोलावून रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. सायंकाळी ४ वाजता प्लॅटफार्म १ व २ वर रेल्वेगाड्यांसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे.

विभागीय संचालक तळ ठोकूनरेल्वेचे विभागीय रेल्वे मंडळ व्यवस्थापक ऋचा खरे या आपल्या अधिकाऱ्यांसह दाखल झाल्या. सध्या त्या रेस्ट हाउसमध्ये तळ ठोकून आहेत. येथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चौकशी सुरू केली आहे. लोकप्रतिनिधींनी केली पाहणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. सोमवारी सकाळी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही पुलाची पाहणी केली व डीआरएम ऋचा खरे यांना भेटून चर्चा केली.

मृत महिलेच्या कुटुंबीयांना ५ लाखमुंबई : बल्लारपूर दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याचीही घोषणा सोमवारी केली. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनालादिले आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर