शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अक्षम्य हलगर्जीमुळेच कोसळला रेल्वे ब्रीज, दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 08:32 IST

दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : रविवारी सायंकाळी बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे या भगदाडातून १७ प्रवासी खाली रेल्वे रुळावर पडून जखमी झाले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले. हा ब्रीज कोसळण्यामागे रेल्वे प्रशासनाची हलगर्जीच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सकाळपासूनच नागपूरची टीम बोलावून रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. सायंकाळी ४ वाजता प्लॅटफार्म १ व २ वर रेल्वेगाड्यांसाठी मार्ग खुला करण्यात आला आहे.

विभागीय संचालक तळ ठोकूनरेल्वेचे विभागीय रेल्वे मंडळ व्यवस्थापक ऋचा खरे या आपल्या अधिकाऱ्यांसह दाखल झाल्या. सध्या त्या रेस्ट हाउसमध्ये तळ ठोकून आहेत. येथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चौकशी सुरू केली आहे. लोकप्रतिनिधींनी केली पाहणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. सोमवारी सकाळी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही पुलाची पाहणी केली व डीआरएम ऋचा खरे यांना भेटून चर्चा केली.

मृत महिलेच्या कुटुंबीयांना ५ लाखमुंबई : बल्लारपूर दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याचीही घोषणा सोमवारी केली. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनालादिले आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर