शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शिक्षण विभागाचे नियोजन ढासळले, इस्त्रोला जाणारे विद्यार्थी हिरमुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:21 IST

आल्या पावली विद्यार्थी परतले : विद्यार्थ्यांनी रंगविलेले स्वप्न मिळाले धुळीस

चंद्रपूर : नवरात्र स्पर्धेतील विजयी झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना इस्त्रोला जाण्याची संधी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली होती. यासाठी संपूर्ण तयारी करून २४ ते २७ मार्चदरम्यान, विद्यार्थ्यांना रेल्वेने नेण्याचे नियोजन झाले. यासाठी गावागावांतून विद्यार्थ्यांना चंद्रपूरला बोलाविण्यात आले. मात्र, ऐनवेळी सहल रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी रंगविलेले स्वप्न धुळीस मिळाले. आल्या पावली विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परतावे लागते. शिक्षण विभागाच्या ढिगास नियोजनामुळे विद्यार्थी हिरमुसले असून, पालकांनीही संताप व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये दरवर्षी ‘नवरत्न’ स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. यावर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेने मोठे गिफ्ट देत थेट इस्त्रो (भारतीय अवकाश संशोधन केंद्र) पाठविण्याचे नियोजन केले. इस्त्रो भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला गेला. एवढेच काय, तर विद्यार्थ्यांनी स्वप्नही रंगविणे सुरू केले.

दरम्यान, २४ ते २९ मार्चदरम्यान, विद्यार्थ्यांना रेल्वेने पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना कळविण्यात आले. एवढेच नाही, तर नियोजित तारखेला उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले. इस्त्रोला जायचे असल्याने विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून तयारी सुरू केली. शिक्षकांच्या प्रत्येक सूचनांचे पालन केले. दरम्यान, जाण्याचा दिवस आला. मिळालेल्या सूचनांनुसार विद्यार्थी चंद्रपुरात दाखल झाले. मात्र, ऐनवेळी रेल्वेचे आरक्षण झाले नसल्याचे कारण देत इस्त्रो सहल रद्द करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. महिनाभरापासून रंगविलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

ऐनवेळी लगीनघाई

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता, रेल्वेचे आरक्षण करताना घोळ झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, इस्त्रोने विद्यार्थ्यांच्या सहलीचा कार्यक्रम आखून दिला. त्या वेळेत जाणे गरजेचे होते. मात्र, रेल्वे आरक्षण झाले नसल्याने ऐनवेळी ट्रॅव्हल्सने विद्यार्थ्यांना नेण्याची तयारी केली. मात्र, अंतर दूर असल्याने ट्रॅव्हल्सने नेणे चुकीचे होईल, या कारणामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली आहे.

चौकशीचे आदेश

झालेल्या चुकीबाबत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याची, तसेच यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.