शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

213 शिक्षकांची धडधड वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

शिक्षक नोकरीसाठी टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून राज्यात काहींनी नोकरी मिळविली असल्याचे उघड झाले असून या प्रकरणाचा आता पोलीस शोध घेत आहे. २०१३ पासून लागलेल्या कोणत्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविली हे आता तपासले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, गैरप्रकारातील धागेदोरे शोधणे पोलिसांनी सुरू केले आहे. दुसरीकडे २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात २०१३ पासून प्राथमिक विभागात २१३ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. आता या सर्वांकडील टीईटी प्रमाणपत्र तपासणी केली जाणार आहे. यासाठी सोमवार दि. ७ ला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत प्रमाणपत्र मागविण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांची धडधड आणखीच वाढली आहे.शिक्षक नोकरीसाठी टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून राज्यात काहींनी नोकरी मिळविली असल्याचे उघड झाले असून या प्रकरणाचा आता पोलीस शोध घेत आहे. २०१३ पासून लागलेल्या कोणत्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविली हे आता तपासले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि शिक्षक संचालकांनी राज्यातील २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागितले आहे.  त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी या सर्वांना प्रमाणपत्र घेऊन हजर राहण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळविले आहे. जिल्ह्यात २०२३ पासून २१३ शिक्षकांना प्राथमिक विभागात नोकरी लागली आहे. त्यामुळे या सर्वांना प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, माध्यमिकच्याही शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार         आहे.

पुणे येथे होणार पडताळणी- २०१३ पासून आतापर्यंत उत्तीर्ण झालेल्या सर्वच शिक्षकांची प्रमाणपत्र पडताळणी पुणे येथे करण्यात येणार आहे. - टीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रमाणपत्र पडताळणी संबंधित शिक्षकांचे प्रमाणपत्र मागितले आहे.

तर होणार फौजदारी कार्यवाही२०१३ नंतर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणी केली जाणार आहे. प्रमाणपत्र घेऊन या शिक्षकांना सोमवार ७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात सादर करावे लागणार आहे. मात्र प्रमाणपत्र सादर न केल्यास किंवा विलंब केल्यास शिक्षण विभाग संबंधित शिक्षकांवर फौजदारी कार्यवाहीही करणार आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक