शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

गोंडपिपरी-खेडी राज्य महामार्ग झाला आहे अक्षरश: मरणमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

कंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम  लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी  या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून होत आहे.

वेदांत मेहरकुळे लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी :  गेल्या अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंडपिपरी - मूल या मार्गाला सध्या मरणवाटेचे स्वरुप आले असून, या मार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेत अनेक जणांचा जीव गेला आहे. या मार्ग निर्मितीचे काम सलग तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. तसेच मार्ग निर्मितीच्या कामात कंत्राटदाराने दोन्ही बाजूस गिट्टी पसरल्याने येथील प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अपघाताची दाट शक्यता बळावली आहे.गोंडपिपरी शहराच्या उत्तरेकडे जाणाऱ्या गोंडपिपरी खेडी हा मार्ग मूल - नागपूर या महामार्गाला जोडणारा मार्ग म्हणून अस्तित्त्वात आला. सुरुवातीला एकेरी मार्ग असताना या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत प्रचंड वाढ झाल्याने या मार्गाचे दुहेरी मार्गात रूपांतर झाले होते. त्यानंतरच्या काळात दिवसागणिक वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मागील पंचवार्षिक भाजप सरकारने हायब्रीड योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देऊन नूतनीकरणातून त्रिपदरी मार्ग करण्यासाठी सत्ताकाळ संपुष्टात येण्याच्या तोंडावर मोठ्या लगीनघाईने कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. कामाचे कंत्राट एसआरके हैदराबाद या कंपनीला मिळताच मार्गाचे एका बाजूचे खोदकाम करून ठेवले. यानंतर मात्र सलग दोन वर्षापर्यंत या मार्गावर केवळ निर्मिती कामाचा टेंभा मिरवून थातूरमातूर खड्डे बुजवले. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून मार्ग निर्मितीचे काम सुरू असल्याचे भासविले गेले.

न्यायालयात याचिकाही दाखलअशातच तालुक्यातील करंजी येथील एसटी महामंडळातील वाहन चालक कर्तव्यावरून गावाकडे येताना दुचाकीचा अपघात होऊन जागेवरच मरण पावला. तसेच खेडी मार्गावर पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार यांचेही अपघाती निधन झाले. कंत्राटदाराच्या या दिरंगाई धोरणाचा विरोध करीत स्थानिक मार्गावरील नांदगाव येथील सरपंच वाकुडकर यांनी वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभागाला जाग न आल्याने थेट न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती.

कामाची तपासणी करावीकंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम  लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी  या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून होत आहे.

राज्य महामार्ग क्र.१३९  चे निर्मिती कार्याची पाहणी दरम्यान योग्य नसलेले काम परत फोडून नव्याने करण्यास कंत्राटदाराला आदेश दिले आहे. तसेच सदर काम गुणवत्ता दर्जा नुसारच पूर्ण होईल.- अनंत भास्करवार कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग २ चंद्रपूर.

 

टॅग्स :highwayमहामार्ग