शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

रिफायनरीचे तीन तुकडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित - हरदीपसिंग पुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 10:48 IST

विदर्भाच्या मागणीचा नक्कीच विचार करणार

चंद्रपूर : रत्नागिरीत मंजूर असलेल्या ६० मिलियन मेट्रिक टन रिफायनरी प्रकल्पावर केंद्र शासन पुनर्विचार करेल. एकाच ठिकाणी ६० मिलियन मेट्रिक टनचा प्रकल्प स्थापन करण्यात अडचणी येत असतील तर २०-२० टनचे तीन प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावर विचार करण्यात येईल, असा पुनरुच्चार केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शुक्रवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला. मात्र, हा निर्णय एकटा घेऊ शकत नाही. याबाबत संबंधित तज्ज्ञ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. हे तीनही प्रकल्प नेमके कुठे स्थापन करायचे, ही बाब लोकांच्या मागणीवर अवलंबून असली तरी विदर्भात चंद्रपूर वा नागपूर येथील लोकप्रतिनिधी मागणी रेटून धरत असतील, तर मोदी सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी एक निर्णय झाला होता. महाराष्ट्रातील रत्नगिरीमध्ये विदेशी गुंतवणूकदार ६० मिलियन मेट्रिक टनचा रिफायनरी प्रकल्प स्थापन करण्यासाठी उत्सुक होते. मात्र, जमीन अधिग्रहण आणि राजकीय आठकाठीमुळे हा प्रकल्प रखडलेला आहे. इतका मोठा प्रकल्प रखडला, याबाबत खंत वाटते. एखादा प्रकल्प येत असेल तर त्याचे स्वागत व्हायला पाहिजे होते. मात्र, या प्रकल्पाबाबत उलट घडले. आता महाराष्ट्रात भाजप सत्तेत आली आहे. याबाबत काही उद्योजकांनी गुरुवारी हा मुद्दा चर्चेतही आणला होता. पेट्रोलियम मंत्री होण्याच्या नात्याने या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हायला पाहिजे.

६० हजार मेट्रिक टनचा इतका मोठा रिफायनरी प्रकल्प एका ठिकाणी स्थापन करण्यात अडचण येत असेल तर २०-२० मिलियन मेट्रिक टनचे तीन प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करायला हरकत नाही, याकडे लक्ष वेधले गेले होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, प्रभारी राजेश बकाने उपस्थित होते.

चंद्रपूरचा प्रस्ताव चांगला

२० मिलियन मेट्रिक टनचा एक प्रकल्प चंद्रपुरात स्थापन व्हावा, अशी मागणीही करण्यात आली. हा एक चांगला प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाचे तीन भाग करायचे वा दोन भाग करायचे, याबाबत पेट्रोलियम मंत्री असलो तरी हा निर्णय एकटा घेऊ शकत नाही. ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. परंतु, हा प्रकल्प मार्गी लागावा, याबाबत प्रयत्न केला जाईल, असेही हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पchandrapur-acचंद्रपूरRatnagiriरत्नागिरीCentral Governmentकेंद्र सरकार