शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

टीईटी परीक्षार्थ्यांना एसटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

परीक्षा केंद्रावर ३० मिनिटांपूर्वी हजर राहावे, अशी सूचना होती. तर २० मिनिटांपूर्वी परीक्षा हॉलमध्ये बसविण्यात येणार होते. परंतु, एसटी महामंडळाचा संप असल्याने काही परीक्षार्थी १० वाजून ५ ते १० मिनिटांनी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. परंतु, या केंद्राचे गेट पेपर १०.३० वाजताचा असताना १० वाजताच बंद झाले. परिणामी परीक्षेच्या २० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहचूनही अनेक परीक्षार्थ्यांना या परीक्षा केंद्रावरून  परीक्षा न देताच परत जावे लागले.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला मागील वर्षीपासून हिरवी झेंडी मिळाल्याने  विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षेचीही जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने अर्ज भरले. मात्र एसटी महामंडळाच्या संपामुळे अनेक विद्यार्थी वेळेच्या आत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. त्यातच काही केंद्रांनी परीक्षार्थ्यांचे काहीच ऐकून न घेता वेळेपूर्वीच  महाविद्यालयाचे गेटच कुलूपबंद केल्याने परीक्षा न देताच अनेकांना परतावे लागले. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू होण्याकरिता शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी जिल्ह्यातील १५ केंद्रांवर घेण्यात आली. प्राथमिक  शिक्षक पात्रता परीक्षेकरिता १५ केंद्रांवरून चार हजार ४९० परीक्षार्थी तर उच्च प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षेकरिता १४ केंद्रावरून ३ हजार ९७५ परीक्षार्थ्यांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर ३० मिनिटांपूर्वी हजर राहावे, अशी सूचना होती. तर २० मिनिटांपूर्वी परीक्षा हॉलमध्ये बसविण्यात येणार होते. परंतु, एसटी महामंडळाचा संप असल्याने काही परीक्षार्थी १० वाजून ५ ते १० मिनिटांनी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. परंतु, या केंद्राचे गेट पेपर १०.३० वाजताचा असताना १० वाजताच बंद झाले. परिणामी परीक्षेच्या २० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहचूनही अनेक परीक्षार्थ्यांना या परीक्षा केंद्रावरून  परीक्षा न देताच परत जावे लागले. याउलट इतर परीक्षा केंद्रावर १०.३० वाजता गेलेल्या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात येऊन परीक्षा देण्याची मुभा दिली. परीक्षा केंद्रावर झालेल्या दुजाभावामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

परीक्षार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर ३० मिनिटांपूर्वी उपस्थित राहण्याची सूचना नमूद आहे. त्यामुळे परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर येणे अपेक्षित होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. - दीपेंद्र लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, चंद्रपूर

एटापल्लीवरून     आले हो सर...- परीक्षेला जायचे आहे म्हणून सकाळी ४ वाजता उठून मिळेल त्या साधनाने चंद्रपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र गाठले. परीक्षेच्या २० मिनिटांपूर्वी केंद्रावर पोहचले. परंतु, महाविद्यालयाने गेटच बंद केले. तीन वर्षांपासून परीक्षा झाली नाही. आता ही पण संधी गेली. सर, खूप दुरून आले, परीक्षेला वेळही आहे. त्यामुळे आता जाऊ द्या, किमान परीक्षा प्रमुखांना भेटू द्या, अशी गयावया एका विद्यार्थिनीने केली. मात्र तेथील कर्मचाऱ्यांना साधा गेट उघडण्याची तसदीही घेतली नाही. 

 केवळ याच केंद्रावर नियम का?- अनेक परीक्षार्थी भाड्याने एकत्रित गाडी करून चंद्रपूरला आले होते. एटापल्ली येथील काही मित्र-मैत्रिणीसुद्धा एकत्रच आले. एका मैत्रिणीला आंबेडकर कॉलेजच्या गेटवर सोडून ते सेंट मायकलच्या परीक्षा केंद्रावर गेले. तरीसुद्धा सेंट मायकलच्या परीक्षार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. परंतु, डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही, असा भेदभाव का करण्यात आला, असा प्रश्न अनेक परीक्षार्थ्यांना पडला आहे. 

 

टॅग्स :examपरीक्षाstate transportएसटी