शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

टेस्टिंग घटल्या, लसीकरण थांबले, तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ६८४ झाली. १ हजार ६७६ चाचण्यांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ६९१, तर ग्रामीण ...

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ६८४ झाली. १ हजार ६७६ चाचण्यांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ६९१, तर ग्रामीण भागात ४३२ असे एकूण ६९१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णांची घसरलेली संख्या कमी चाचण्यांमुळे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये शहरी भागातून ४४ हजार ५१२, तर ग्रामीण भागात २७ हजार ९०७ नागरिक पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ४१९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. पॉझिटिव्हमध्ये शहरी भाग ६१.४६ टक्के तर ग्रामीण भागात ३८.५४ टक्के आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला ग्रामीण भागातील नागरिकांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला; परंतु महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काय?

१ ग्रामीण व शहरी भागात २ लाख ४४ हजार ८२१ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात १ लाख ४९ हजार ३२० नागरिक हायरिस्क गटात येतात. अशा नागरिकांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार ४१ एवढी आहे; परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण चंद्रपूर मनपा क्षेत्रात अधिक (१७.३१) तर ग्रामीण भागात (१०.४७) कमी आहे.

२ दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. लोकसंख्येचा तुलनात्मक विचार केल्यास बाधितांचे प्रमाण कमी आहे; परंतु लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्हची संख्या आता वाढत आहे. उपचार करण्यास विलंब होत असल्याने मृतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

३ कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात विलगीकरण कक्षाचा अभाव होता. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असणाऱ्या कुटुंबातील सदस्य एकाच घरात कसेबसे राहतात. अशा वेळी पॉझिटिव्ह आढळल्यास इतरांनाही संसर्गाचा धोका होता; पण दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतींना निधी मिळाल्याने गावातच विलगीकरण कक्ष तयार करणे सोपे झाले.

४ सध्या खरीपपूर्व हंगामाची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीसाठी तालुकास्थळी जावे लागते. या संपर्कामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाचे बियाणे व खते गावातच पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लसींवर शहरी नागरिकांचा डल्ला

लसीकरण सुरू झाल्यानंतर शहरी भागातील नागरिकांनीच ऑनलाइन नोंदणी ग्रामीण नागरिकांच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारला. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे लसीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद आहेत. नागरिकांचे लसीकरण थांबले. टेस्टिंगची संख्या घटविली. आरोग्य तज्ज्ञ व सरकारकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला आहे. अशा स्थितीत ही लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

ऑनलाइन नोंदणी त्रासदायक

लसीकरणासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी केंद्रांची संख्या वाढविली; पण जिल्ह्याला पुरेसे डोस मिळत नाही. १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना अशी नोंदणी करणे शक्य नाही. शहरी नागरिक याचाच गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली.