शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

टेस्टिंग घटल्या, लसीकरण थांबले, तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ६८४ झाली. १ हजार ६७६ चाचण्यांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ६९१, तर ग्रामीण ...

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ६८४ झाली. १ हजार ६७६ चाचण्यांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ६९१, तर ग्रामीण भागात ४३२ असे एकूण ६९१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णांची घसरलेली संख्या कमी चाचण्यांमुळे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये शहरी भागातून ४४ हजार ५१२, तर ग्रामीण भागात २७ हजार ९०७ नागरिक पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ४१९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. पॉझिटिव्हमध्ये शहरी भाग ६१.४६ टक्के तर ग्रामीण भागात ३८.५४ टक्के आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला ग्रामीण भागातील नागरिकांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला; परंतु महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काय?

१ ग्रामीण व शहरी भागात २ लाख ४४ हजार ८२१ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात १ लाख ४९ हजार ३२० नागरिक हायरिस्क गटात येतात. अशा नागरिकांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार ४१ एवढी आहे; परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण चंद्रपूर मनपा क्षेत्रात अधिक (१७.३१) तर ग्रामीण भागात (१०.४७) कमी आहे.

२ दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. लोकसंख्येचा तुलनात्मक विचार केल्यास बाधितांचे प्रमाण कमी आहे; परंतु लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्हची संख्या आता वाढत आहे. उपचार करण्यास विलंब होत असल्याने मृतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

३ कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात विलगीकरण कक्षाचा अभाव होता. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असणाऱ्या कुटुंबातील सदस्य एकाच घरात कसेबसे राहतात. अशा वेळी पॉझिटिव्ह आढळल्यास इतरांनाही संसर्गाचा धोका होता; पण दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतींना निधी मिळाल्याने गावातच विलगीकरण कक्ष तयार करणे सोपे झाले.

४ सध्या खरीपपूर्व हंगामाची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीसाठी तालुकास्थळी जावे लागते. या संपर्कामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाचे बियाणे व खते गावातच पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लसींवर शहरी नागरिकांचा डल्ला

लसीकरण सुरू झाल्यानंतर शहरी भागातील नागरिकांनीच ऑनलाइन नोंदणी ग्रामीण नागरिकांच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारला. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे लसीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद आहेत. नागरिकांचे लसीकरण थांबले. टेस्टिंगची संख्या घटविली. आरोग्य तज्ज्ञ व सरकारकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला आहे. अशा स्थितीत ही लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

ऑनलाइन नोंदणी त्रासदायक

लसीकरणासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी केंद्रांची संख्या वाढविली; पण जिल्ह्याला पुरेसे डोस मिळत नाही. १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना अशी नोंदणी करणे शक्य नाही. शहरी नागरिक याचाच गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली.