शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

टेस्टिंग घटल्या, लसीकरण थांबले, तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ६८४ झाली. १ हजार ६७६ चाचण्यांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ६९१, तर ग्रामीण ...

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ६८४ झाली. १ हजार ६७६ चाचण्यांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ६९१, तर ग्रामीण भागात ४३२ असे एकूण ६९१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णांची घसरलेली संख्या कमी चाचण्यांमुळे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये शहरी भागातून ४४ हजार ५१२, तर ग्रामीण भागात २७ हजार ९०७ नागरिक पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ४१९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. पॉझिटिव्हमध्ये शहरी भाग ६१.४६ टक्के तर ग्रामीण भागात ३८.५४ टक्के आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला ग्रामीण भागातील नागरिकांकडूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला; परंतु महानगरपालिका, नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काय?

१ ग्रामीण व शहरी भागात २ लाख ४४ हजार ८२१ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात १ लाख ४९ हजार ३२० नागरिक हायरिस्क गटात येतात. अशा नागरिकांची एकूण संख्या ४ लाख ४१ हजार ४१ एवढी आहे; परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण चंद्रपूर मनपा क्षेत्रात अधिक (१७.३१) तर ग्रामीण भागात (१०.४७) कमी आहे.

२ दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. लोकसंख्येचा तुलनात्मक विचार केल्यास बाधितांचे प्रमाण कमी आहे; परंतु लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्हची संख्या आता वाढत आहे. उपचार करण्यास विलंब होत असल्याने मृतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

३ कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात विलगीकरण कक्षाचा अभाव होता. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असणाऱ्या कुटुंबातील सदस्य एकाच घरात कसेबसे राहतात. अशा वेळी पॉझिटिव्ह आढळल्यास इतरांनाही संसर्गाचा धोका होता; पण दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतींना निधी मिळाल्याने गावातच विलगीकरण कक्ष तयार करणे सोपे झाले.

४ सध्या खरीपपूर्व हंगामाची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीसाठी तालुकास्थळी जावे लागते. या संपर्कामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाचे बियाणे व खते गावातच पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लसींवर शहरी नागरिकांचा डल्ला

लसीकरण सुरू झाल्यानंतर शहरी भागातील नागरिकांनीच ऑनलाइन नोंदणी ग्रामीण नागरिकांच्या हक्काच्या लसीवर डल्ला मारला. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे लसीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद आहेत. नागरिकांचे लसीकरण थांबले. टेस्टिंगची संख्या घटविली. आरोग्य तज्ज्ञ व सरकारकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला आहे. अशा स्थितीत ही लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

ऑनलाइन नोंदणी त्रासदायक

लसीकरणासाठी नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी केंद्रांची संख्या वाढविली; पण जिल्ह्याला पुरेसे डोस मिळत नाही. १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना अशी नोंदणी करणे शक्य नाही. शहरी नागरिक याचाच गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली.