शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

वाघाची डरकाळीने वरोरा तालुक्यातील गावात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेतातील पिकांची काढणीसाठ शेतकरी व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील अनेक गावाच्या शिवारात वाघाची दहशत आहे. सद्यातरी पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरू केल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली असून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. एकटी व्यक्ती शेतीकडे जात नाही. सायंकाळी लवकरच घराकडे परत येत असल्याने शेतातील कामावर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.वायगाव, बेंबळ, बोरगाव या गाव परिसरात वाघाने बस्तान मांडले असल्याने वाघ केव्हा येईल, याचा नेम नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाच धस्तावला आहे. वन विभागाने वाघ वावरत असलेल्या ठिकाणी रात्र व दिवसा गस्त करणे सुरू केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.शेतकऱ्याचा प्रामाणिकपणाबोरगाव (शि) येथील शेतशिवारात वाघ आल्याचे नागरिकांना दिसताच त्याला हुसकावून लावले. अशातच शेतात बांधून असलेल्या बैलाने दोर तोडला. त्याच्या तोंडाला दुखापत झाली. ही दुखापत वाघाने हल्ला केल्याने झाल्याची माहिती पंचक्रोशीत पोहचली. त्यानंतर शेतमालक अशोक खंगार यांनी बैल बांधून असलेल्या ठिकाणी शहानिशा केली तर बैलाने दोर तोडल्याने त्याला दुखापत झाल्याचे त्यांना दिसले. येथेही त्यांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करुन दाखविला.जंगलामध्ये पाळीव प्राणी गेल्यानंतर जंगली प्राण्याने हल्ला केल्यास त्या पशुधन मालकाजवळ चराई पास असणे आवश्यक आहे.- किरण धानकुटेवनपरिक्षेत्र अधिकारी, खडसंगी.

टॅग्स :forestजंगल