शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची डरकाळीने वरोरा तालुक्यातील गावात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेतातील पिकांची काढणीसाठ शेतकरी व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील अनेक गावाच्या शिवारात वाघाची दहशत आहे. सद्यातरी पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरू केल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली असून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.सद्या शेतीचा हंगाम असून शेतात गहू, चणा, कापूस आदी पिके उभी आहेत. शेतकरी पिकाच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना वरोरा तालुक्यातील शेंबळ करंजी, वायगाव, बेंबळ, बोरगाव (शि) आदी गावाच्या शेत शिवारात वाघाने धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. सद्या वाघाने गाय व बैलावर हल्ले केले आहेत. वरोरा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना वाघाने दर्शन दिले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून कापूस वेचणीकरिता मजूर मिळणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. एकटी व्यक्ती शेतीकडे जात नाही. सायंकाळी लवकरच घराकडे परत येत असल्याने शेतातील कामावर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.वायगाव, बेंबळ, बोरगाव या गाव परिसरात वाघाने बस्तान मांडले असल्याने वाघ केव्हा येईल, याचा नेम नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाच धस्तावला आहे. वन विभागाने वाघ वावरत असलेल्या ठिकाणी रात्र व दिवसा गस्त करणे सुरू केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.शेतकऱ्याचा प्रामाणिकपणाबोरगाव (शि) येथील शेतशिवारात वाघ आल्याचे नागरिकांना दिसताच त्याला हुसकावून लावले. अशातच शेतात बांधून असलेल्या बैलाने दोर तोडला. त्याच्या तोंडाला दुखापत झाली. ही दुखापत वाघाने हल्ला केल्याने झाल्याची माहिती पंचक्रोशीत पोहचली. त्यानंतर शेतमालक अशोक खंगार यांनी बैल बांधून असलेल्या ठिकाणी शहानिशा केली तर बैलाने दोर तोडल्याने त्याला दुखापत झाल्याचे त्यांना दिसले. येथेही त्यांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करुन दाखविला.जंगलामध्ये पाळीव प्राणी गेल्यानंतर जंगली प्राण्याने हल्ला केल्यास त्या पशुधन मालकाजवळ चराई पास असणे आवश्यक आहे.- किरण धानकुटेवनपरिक्षेत्र अधिकारी, खडसंगी.

टॅग्स :forestजंगल