शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:04 IST

दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही.

ठळक मुद्देअर्धवट बांधकाम : बांधकाम विभाग लक्षच देईना !

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. याला दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने बांधकाम पूर्ण करून संबंधित विभाग माथरावासीयांची तहान केव्हा भागविणार,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.राजुरा तालुक्यातील माथरा गाव तालुकास्थळापासून सहा किमी अंतरावर वसले आहे. जवळपास ८०० लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याची टंचाई लक्षात घेता पेयजल योजनेतून १० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधली. मात्र अल्पावधीतच या योजनेला ग्रहण लागल्याने टाकीचे बांधकाम अर्ध्यावरच रखडले. येथील सरपंच लहुजी चहारे यांनी व गावकऱ्यांनी टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी माथरावासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.माथरा गवात आजघडीला सहा सरकारी हातपंप आहेत. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंपांनाही नियमित पाणी येत नाही. या परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालाविल्याने हे हातपंप अखेरच्या घटका मोजत आहे. नदी, नाले, तलाव, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. गावकºयांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. माथरा येथे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाल्याने पाणी नळयोजनेच्या माध्यमातून घरापर्यंत पोहचेल म्हणून गावकरी समाधानी होते. परंतु ही पाणीपुरवठा नळयोजना अल्पावधीतच रखडल्याने नागरिकांच्या चेहºयावरचा आनंद फार काळ टिकला नाही.माथरा येथे पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत आटायला लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. १० वर्षांपासून पाणीपुरवठा नळयोजनेचे काम अपूर्ण असून संबंधित विभागाने टाकीचे काम पूर्ण करून गावकºयांसाठी नळयोजना कार्यान्वित करावी.-लहुजी चहारे, सरपंच, माथरा

टॅग्स :water shortageपाणीटंचाई