शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:04 IST

दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही.

ठळक मुद्देअर्धवट बांधकाम : बांधकाम विभाग लक्षच देईना !

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. याला दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने बांधकाम पूर्ण करून संबंधित विभाग माथरावासीयांची तहान केव्हा भागविणार,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.राजुरा तालुक्यातील माथरा गाव तालुकास्थळापासून सहा किमी अंतरावर वसले आहे. जवळपास ८०० लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याची टंचाई लक्षात घेता पेयजल योजनेतून १० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधली. मात्र अल्पावधीतच या योजनेला ग्रहण लागल्याने टाकीचे बांधकाम अर्ध्यावरच रखडले. येथील सरपंच लहुजी चहारे यांनी व गावकऱ्यांनी टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी माथरावासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.माथरा गवात आजघडीला सहा सरकारी हातपंप आहेत. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंपांनाही नियमित पाणी येत नाही. या परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालाविल्याने हे हातपंप अखेरच्या घटका मोजत आहे. नदी, नाले, तलाव, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. गावकºयांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. माथरा येथे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाल्याने पाणी नळयोजनेच्या माध्यमातून घरापर्यंत पोहचेल म्हणून गावकरी समाधानी होते. परंतु ही पाणीपुरवठा नळयोजना अल्पावधीतच रखडल्याने नागरिकांच्या चेहºयावरचा आनंद फार काळ टिकला नाही.माथरा येथे पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत आटायला लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. १० वर्षांपासून पाणीपुरवठा नळयोजनेचे काम अपूर्ण असून संबंधित विभागाने टाकीचे काम पूर्ण करून गावकºयांसाठी नळयोजना कार्यान्वित करावी.-लहुजी चहारे, सरपंच, माथरा

टॅग्स :water shortageपाणीटंचाई