शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:04 IST

दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही.

ठळक मुद्देअर्धवट बांधकाम : बांधकाम विभाग लक्षच देईना !

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. याला दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने बांधकाम पूर्ण करून संबंधित विभाग माथरावासीयांची तहान केव्हा भागविणार,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.राजुरा तालुक्यातील माथरा गाव तालुकास्थळापासून सहा किमी अंतरावर वसले आहे. जवळपास ८०० लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याची टंचाई लक्षात घेता पेयजल योजनेतून १० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधली. मात्र अल्पावधीतच या योजनेला ग्रहण लागल्याने टाकीचे बांधकाम अर्ध्यावरच रखडले. येथील सरपंच लहुजी चहारे यांनी व गावकऱ्यांनी टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी माथरावासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.माथरा गवात आजघडीला सहा सरकारी हातपंप आहेत. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंपांनाही नियमित पाणी येत नाही. या परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालाविल्याने हे हातपंप अखेरच्या घटका मोजत आहे. नदी, नाले, तलाव, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. गावकºयांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. माथरा येथे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाल्याने पाणी नळयोजनेच्या माध्यमातून घरापर्यंत पोहचेल म्हणून गावकरी समाधानी होते. परंतु ही पाणीपुरवठा नळयोजना अल्पावधीतच रखडल्याने नागरिकांच्या चेहºयावरचा आनंद फार काळ टिकला नाही.माथरा येथे पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत आटायला लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. १० वर्षांपासून पाणीपुरवठा नळयोजनेचे काम अपूर्ण असून संबंधित विभागाने टाकीचे काम पूर्ण करून गावकºयांसाठी नळयोजना कार्यान्वित करावी.-लहुजी चहारे, सरपंच, माथरा

टॅग्स :water shortageपाणीटंचाई