शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

सीमेवरील वादग्रस्त गावात पुन्हा तेलंगणाच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:06 PM

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील ‘त्या’ वादग्रस्त गावात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा त्याच गावात तेलंगणा राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रकिय्रा सुरू झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देकिती दिवस चालणार वाद? : महाराष्ट्र शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील ‘त्या’ वादग्रस्त गावात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा त्याच गावात तेलंगणा राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रकिय्रा सुरू झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील त्या वादग्रस्त १४ गावांत यापूर्वी अंतापूर आणि परमडोली या दोन ग्रामपंचायती होत्या. आता नव्याने मुकादमगुडा आणि भोलापठार या दोन ग्रामपंचायती झाल्या असून या चारही ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होणार आहे. या वादग्रस्त गावातील नागरिक दोन्ही राज्यात मतदान करतात. हीे त्या नागरिकांसाठी नवीन बाब नाही. तरीही या गावातील नागरिकांचा कल महाराष्ट्र शासनाच्या बाजुने आहे.विशेष म्हणजे, १७ जुलै १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्र शासनाचीच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. तरीही तेलंगणा राज्य या गावांवर आपला अधिकार गाजवित आहे आणि महाराष्ट्र शासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. हे येथील नागरिकांचे दुर्देव. न्यायालयीन प्रकिया पुर्ण झाल्यानंतर तेलंगणा शासनाचा त्या गावावरील संपुर्ण अधिकार संपुष्टात आल्यावरसुद्धा केवळ मतदान यादीच्या भरोशावर तेलंगणा राज्य येथे निवडणुका घेत आहे. महाराष्ट्राच्या बाजुने तर संपुर्ण जनता आहे. येथील संपूर्ण नागरिक मराठी भाषिक आहेत. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. जमीन महाराष्ट्र शासनाचीच असून महसुली गावे म्हणून त्या १४ गावाची ओळख आहे. मग महाराष्ट्र शासन त्या तेलंगणा शासनाचा ताबा १४ गावांवरून का हटवत नाही. अजून किती दिवसानंतर येथील नागरिक दोन राज्याच्या कचाट्यातून बाहेर पडेल असा प्रश्न आता येथील सर्वसामान्य नागरिक विचारू लागला आहे. या वादग्रस्त १४ गावात महाराष्टÑ व तेलंगणा अशा दोन्ही राज्याच्या ग्रामपंचायती आहेत. आता तेलंगणा राज्य येथे ग्रामपंचायती निवडणुका घेत आहे. तरीही राज्य शासन गप्पच आहे.