शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

खाद्यतेलासाठी शिक्षकांना करावी लागणार दारोदारी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र,  शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अग्रिम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोषण आहारची गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षकांचा ताण वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना १५ मार्चपासून  शिजविलेले अन्न पाककृतीनुसार द्यावयाची आहे.  यासाठी लागणारे तांदूळ, धान्यादी व इतर आवश्यक साहित्य पुरवठादार शाळेच्या स्तरावर करणार आहे. मात्र, त्याकरिता लागणारे खाद्यतेल सोयाबीन हे शाळांनी खरेदी करावे, इंधन व पालेभाज्यांवरील खर्च करणाऱ्या यंत्रणेकडून किंवा नेमलेल्या बचत गटाकडून करावयाचे आहे. सद्य:स्थितीत तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच शाळांमध्ये शून्य बॅलन्स असल्याने शासनाने अग्रिम अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी केली आहे. यासंदर्भात शासनाला निवेदनही पाठविले आहे.शिक्षण विभागाने पुरवठादारासोबत केलेल्या करारनाम्यामध्ये सोयाबीन खाद्यतेलाचा समावेश करण्यात आला नाही, असे शिक्षण संचालकांच्या पत्रात म्हटले आहे. पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र,  शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अग्रिम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोषण आहारची गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षकांचा ताण वाढला आहे.

अधिकचा ताण यापूर्वी इंधन व भाजीपाला खर्च शालेय पोषण आहार यंत्रणेद्वारे प्रथम केला जात होता. त्यानंतर  खर्च केलेली रक्कम दोन, तीन महिन्यांनंतर प्राप्त होत होती. आता यावेळी इंधन व भाजीपाल्यासोबतच खाद्यतेलाचा खर्च करणे आवश्यक झाल्याने शालेय पोषण आहार यंत्रणेला अधिकचा ताण सहन करावा लागणार आहे.

धान्य पोहोचलेच नाही- १५ मार्चपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिजवलेला पोषण आहार  द्यायचा आहे. मात्र, जिल्ह्यातील शाळांमध्ये अद्यापही धान्यच पोहोचले नाही. त्यामुळे पोषण आहार देताना शिक्षकांची धावपळ होत आहे. दुसरीकडे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना  पोषण आहार दिला की नाही, याची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहे. त्यामुळे इकडे आड-तिकडे विहीर, अशी अवस्था शिक्षकांची झाली आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा