शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

खाद्यतेलासाठी शिक्षकांना करावी लागणार दारोदारी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र,  शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अग्रिम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोषण आहारची गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षकांचा ताण वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना १५ मार्चपासून  शिजविलेले अन्न पाककृतीनुसार द्यावयाची आहे.  यासाठी लागणारे तांदूळ, धान्यादी व इतर आवश्यक साहित्य पुरवठादार शाळेच्या स्तरावर करणार आहे. मात्र, त्याकरिता लागणारे खाद्यतेल सोयाबीन हे शाळांनी खरेदी करावे, इंधन व पालेभाज्यांवरील खर्च करणाऱ्या यंत्रणेकडून किंवा नेमलेल्या बचत गटाकडून करावयाचे आहे. सद्य:स्थितीत तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच शाळांमध्ये शून्य बॅलन्स असल्याने शासनाने अग्रिम अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी केली आहे. यासंदर्भात शासनाला निवेदनही पाठविले आहे.शिक्षण विभागाने पुरवठादारासोबत केलेल्या करारनाम्यामध्ये सोयाबीन खाद्यतेलाचा समावेश करण्यात आला नाही, असे शिक्षण संचालकांच्या पत्रात म्हटले आहे. पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र,  शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अग्रिम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोषण आहारची गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षकांचा ताण वाढला आहे.

अधिकचा ताण यापूर्वी इंधन व भाजीपाला खर्च शालेय पोषण आहार यंत्रणेद्वारे प्रथम केला जात होता. त्यानंतर  खर्च केलेली रक्कम दोन, तीन महिन्यांनंतर प्राप्त होत होती. आता यावेळी इंधन व भाजीपाल्यासोबतच खाद्यतेलाचा खर्च करणे आवश्यक झाल्याने शालेय पोषण आहार यंत्रणेला अधिकचा ताण सहन करावा लागणार आहे.

धान्य पोहोचलेच नाही- १५ मार्चपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिजवलेला पोषण आहार  द्यायचा आहे. मात्र, जिल्ह्यातील शाळांमध्ये अद्यापही धान्यच पोहोचले नाही. त्यामुळे पोषण आहार देताना शिक्षकांची धावपळ होत आहे. दुसरीकडे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना  पोषण आहार दिला की नाही, याची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहे. त्यामुळे इकडे आड-तिकडे विहीर, अशी अवस्था शिक्षकांची झाली आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा