शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

शिक्षकांच्या बदल्यांवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:24 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने अभ्यासगटाची नियुक्ती केली होेती. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच या अभ्यास गटाने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोरोनाच्या सावटामुळे शासन शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात कार्य निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देअभ्यासगटाने सादर केला एक महिन्यापूर्वीच शासनाकडे आपला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने अभ्यासगटाची नियुक्ती केली होेती. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच या अभ्यास गटाने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोरोनाच्या सावटामुळे शासन शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात कार्य निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसंदर्भात दरवर्षी मोठा गोंधळ होतो. या बदल्यांमध्ये एकसुत्रता यावी, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी काही वर्षांपूर्वी शिक्षकांची बदली ऑनलाईन करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले होते. या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. ऑनलाईन बदलीमुळे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय हस्तक्षेपावरही काही प्रमाणात हा होईना, आळा बसला. मात्र या धोरणामध्येही काही त्रुटी असल्याचे नव्या सरकारच्या लक्षात येताच या बदल्यांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्यस्तरीय शिक्षण बदली धोरण ठरविण्यासाठी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,सचिवपदी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सदस्य म्हणून नंदूरबार जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गौडा, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ राहूल कर्डिले, उस्मानाबाद जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. संजय कोलते यांचा समावेश होता. या अभ्यासगटाने आपल्या निर्धारित वेळेत शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्याकडे अहवाल सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच देशात आलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे शासकीय स्तरावर हा अहवाल आता मागे पडला असून सर्व प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये गुंतली आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांची बदली होण्याची शक्यता आतातरी मावळली आहे.शासननिर्णयाप्रमाणे शिक्षक पती-पत्नींना एकत्रिक बदली करून एकत्र आणण्यात आले होते. मात्र मागील वर्षी यातील काही बदलीपात्र झाल्याने दुसरीकडे बदली करण्यात आली. त्यामुळे पुन्हा पती-पत्नी दुरावले. विशेष म्हणजे, पती-पत्नी यापैकी दोघांच्या शाळेचे अंतर ३० कि..मी. पेक्षा अधिक नसावे, असा नियम असतानाही मागील वर्षी दूरवर बदली झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे नव्या अहवालानुसार यावर्षी बदली होऊन किमान आपण एकत्र येऊ, अशी अपेक्षा या शिक्षकांना होती. मात्र कोरोनामुळे ती यावर्षी तरी पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTeacherशिक्षक