शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

गुरुजी; तुम्ही चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:57 IST

चारित्र्य प्रमाणपत्र अत्यावश्यक : प्रमाणपत्र नसेल तर नोकरी जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : बदलापूर येथील घटनेनंतर राज्यभरात मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये मुली, विद्यार्थी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आता कठोर पाऊल उचलले असून शाळांमध्ये सीसीटीव्हींसह अन्य विविध बाबींवर लक्ष केंद्रीय केले आहे. विशेष म्हणजे, खासगी शाळांमध्ये नव्याने रुजू होण्यापूर्वी शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना आता पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन ते शाळेत प्रथम जोडावे लागणार आहे. त्यानंतरच नोकरीत रुजू होता येणार आहे.

या सर्व घटना घडत असतानाच सोमवारी कोरपना येथे पुन्हा असेच प्रकरण उघडकीस आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासगी शाळांमध्ये शिक्षिक, मदतनीस, चालक, लिपिक तसेच अन्य कामे करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची गरज असते. मात्र काही संस्थाचालक कर्मचाऱ्यांची कोणतीही पडताळणी न करता कामावर ठेवतात. आता मात्र पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नोकरीत सामावून घेताच येणार नसल्याचे शासनाने सूचनांसंदर्भात पत्रकच काढले आहे. अन्यथा संस्था चालकांवरही कारवाई होणार आहे. 

प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करणार?

  • आपले सरकार पोर्टल किंवा चारित्र्य पडताळणीच्या पोर्टलवर जाऊन अर्जदाराने नोंदणी करावी. नोंदणी करताना आपण ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो (शहरी किंवा ग्रामीण) त्याची निवड करावी. एकदा फॉर्म सबमिट केल्यास पुन्हा चूक दुरुस्त करता येत नाही. नोंदणीनंतर युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
  • चारित्र्य पडताळणी हा पर्याय निवडल्यानंतर दोन प्रकारचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळतील. 
  • फॉर्म भरताना वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता आणि चारित्र्य पडताळणी, आपण कुठे वास्तव्य केले आहे. किती काळ केले आहे त्याची माहिती भरावी लागते. आपल्यावर गुन्हा झाला असल्यास 'एस' किंवा नसल्यास 'नो' क्लीक करावे लागले.

 

पोलिस ठाण्यांत गर्दी जिल्ह्यातील विविध खासगी शाळा तसेच नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी यासाठी पोलिस स्टेशनमध्ये अर्ज सादर केला आहे विशेष म्हणजे, शासकीय नोकरीत रुजू होण्यापूर्वी प्रथम चारित्र्य प्रमा X जोडावे लागते. त्यामुळे सध्या पोलिस स्टेशनमध्ये प्रमाणपत्रांस करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

शिक्षकांना चारित्र्य पडताळणी आवश्यक बदलापूर येथील घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कठोर पाऊल उचलले आहे. यामध्ये शिक्षकांना चारित्र्य पडताळणी करावी लागणार आहे. विशेषतः खासगी शाळांमध्ये नवीन रुजू होण्याऱ्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना चारित्र्य प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले.

काय सांगते आकडेवारी? खासगी शाळांमध्ये नव्याने रुजू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना तर आता प्रमाणपत्र द्यावेच लागणार आहे. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास सध्या काही प्रमाणात प्रमाणपत्रासाठी पोलिस स्टेशनमध्ये अर्ज करण्यात आले आहे.

शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात..."मागील काही दिवसांमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहे. या घटना एकूणच समाजासाठी धोकादायक आहे. यातून शाळा, शिक्षकांची प्रतिमा मलिन होत आहे. या घटनांवर आळा घालणे महत्त्वाचे आहे. काही अपप्रवृत्तीमुळे एकूणच शिक्षणक्षेत्र बदनाम होत आहे. त्यामुळे कठोर नियम करणे आवश्यक आहे."- प्रकाश चुनारकर, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद

"शाळांमध्येच नाही तर एकूणच समाजातही अशा घटना घडणे धोक्याचे आहे. राज्यभरात काही शाळांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे मन विचलित होते. शिक्षणक्षेत्र अशा घटनांमुळे बदनाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाधिक नियम कठोर करणे आवश्यक आहे."- जे. डी. पोटे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Educationशिक्षणchandrapur-acचंद्रपूर