शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

शिक्षकाने केले शिक्षकांनाच नापास

By admin | Updated: October 10, 2015 00:23 IST

विद्येचे माहेरघर ब्रह्मपुरी येथे सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या चरणांना स्पर्श करून अनेक शिक्षक विद्यादानाचे पवित्र्य कार्य प्रामाणिक बजावत असल्याने या नगरीला शिक्षणनगरी अशी ख्याती ....

रवी रणदिवे  ब्रह्मपुरीविद्येचे माहेरघर ब्रह्मपुरी येथे सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या चरणांना स्पर्श करून अनेक शिक्षक विद्यादानाचे पवित्र्य कार्य प्रामाणिक बजावत असल्याने या नगरीला शिक्षणनगरी अशी ख्याती पंचक्रोशीत नामाभिधान झाली आहे. मात्र शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तृतीय वर्षाला शिकणारी स्वाती निकुरे या विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने एका शिक्षकाने येथील हजारो शिक्षकांना चक्क नापासच केल्याचे कृत्य असल्याचे बोलले जात आहे.स्वाती ही मूळची चिंचाळा (घुग्घुस) येथील रहिवासी होती. दहावी परीक्षा उत्तीर्ण करून तिला ब्रह्मपुरीला पॉलिटेक्नीक करायला यावे लागले. पाहता पाहता तिचे दोन वर्ष मजेत गेले. सुखदु:खाच्या सोबतीचे तिने फक्त आणि फक्त शिक्षणच घेतले. वडील टिप्पर ड्रायव्हर व आई मजुरीचे काम करून मुलीमध्ये इंजिनिअरची स्वप्ने पाहात, आमचेही दिवस सोनेरी येथील ही आस लावून बसले होते. पण स्वातीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करुन त्यांना पुन्हा दु:खाच्या खाईत टाकले आहे. ते केवळ ज्याला गुरुचे स्थान आहे, ज्याला समाजात मानाचे स्थान आहे, त्या शिक्षकाकडूनच असे कृत्य होईल, असे स्वप्नातही स्वातीने व कुटुंबीयाने मनातही आणले नसेल. त्याच विद्यादानाच्या भोक्त्याने एका विद्यार्थिनीचा जीव घ्यावा, ही शोकांतिका साऱ्या शिक्षकांचा अपमान व काळीमा लावणारी असल्याने आम्हा साऱ्या शिक्षकांना या प्राध्यापकाने नापासच केल्याची खंत वाटत असल्याची शिक्षक वर्ग बोलून दाखवित आहे. तंत्रनिकेतनमध्ये शिकणारे विद्यार्थी सर्वच काही श्रीमंत घराण्यातील नसतात. रिक्षावाले, मजूर, शेतकरी, कबाळकष्ट करणाऱ्या कुटुंबातील मुले ब्रह्मपुरीला शिक्षण घेतात, हे वास्तव्य आहे. आपली पदरमोड करुन मुलांना, मुलींना पालक शिकवितात. त्यातील काही मुले मौज करतात. पण जी मुले गरीब कुटुंबातील आहेत, ती खरच शिकण्यासाठीच धडपड करत असतात. कॉलेजमध्ये प्राध्यापकांमध्ये झालेले प्रसंग ते कधीच पालकांना सांगत नाही. विविध परीक्षेचे गुण आपल्याला मिळणार नाही. नापास होऊ या भीतीपोटी विद्यार्थी बोलत नाही. परंतु वारंवार अन्याय व अपमान झाला तर अशा घटना घडतात. विद्यार्थी चुकला तर त्याला योग्य मार्ग दाखविणे हे शिक्षकाचे मुख्य कर्तव्य आहे. येथे तर विद्यार्थ्यांला दबावात ठेवणे, त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे या गोष्टी शिक्षकीपेशाला काळीमा फासणाऱ्या आहेत. महाविद्यालयाला नियमित प्राचार्य नाहीगेली अनेक वर्षांपासून या महाविद्यालयात नियमित प्राचार्य नाही. प्रभारी प्राचार्यावर हे महाविद्यालय सुरू असल्याने वचक राहीले नाही. येथे पाण्याची समस्या प्रमुख असली, तरी अनेक बाबींचा अजूनही अभाव आहे. प्रा. सुहास मेश्राम हे ज्या विभागात कार्य करीत होते त्या विभाग प्रमुखाला या साऱ्या घडामोडीचा सुगावा का लागला नाही व लागला असेल तर त्यांनी या प्रकारावर योग्य भूमिका का घेतली नाही, असे एक ना अनेक प्रश्नांची धूळफेक या घटनेने या महाविद्यालयावर पालक, विद्यार्थी व शहरातील जाणते नागरिक करीत आहेत.