शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजुऱ्यात टँकरने पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:26 IST

सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देआमदारांचा पुढाकार : वर्धा नदी आटल्याने शहरावर जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. तसेच पर्यायी स्त्रोतांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, अनेक वॉर्डात पाणी समस्या गंभीर असल्यामुळे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.शहरात तीव्र पाणी टंचाईची समस्या यावर्षी प्रथमच निर्माण झाली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन नसल्यामुळे नगर पालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. सोमनाथपूर वॉर्डात नगरसेवक राजू डोहे यांनी स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर आमदार अ‍ॅड. धोटे यांनी स्वत: पुढाकार घेत अनेक वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी आपल्या कार्यालयाच्या संपर्क क्रमांकावर नागरिकांना फोन करून पाण्याची मागणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सकाळी आणि सायंकाळी गरजेप्रमाणे वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नगर प्रशासनावरील ताण थोडा कमी झाला आहे. मात्र वर्धा नदीच्या पात्रातील पाणी कालगाव येथील इनटेक विहिरीकडे वळविण्यासाठी नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.नदीच्या पात्रात पाण्याची पातळी खाली गेल्याने पाणी मुबलक मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पर्यायी स्त्रोतांवर नागरिकांना पाणीपुरवठा करणे गरजेचे झाले आहे. या क्षेत्रात असलेल्या कोळसा व सिमेंट उद्योगांतर्गत मोठ्या प्रमाणात पाणी लागते. वर्धा नदीतून पाणी घेतले जाते. या नदीचा प्रवाह कायमम ठेवण्यासाठी किंवा पाणी उपलब्ध राहील अशी व्यवस्था करण्यासाठी बॅरेज बंधारा बांधण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र, शासनाने कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरावर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.उद्योगाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळते. मात्र, हा निधी इतरत्र वळवून येथील विकास कामांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी येथील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई