शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजुऱ्यात टँकरने पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:26 IST

सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देआमदारांचा पुढाकार : वर्धा नदी आटल्याने शहरावर जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. तसेच पर्यायी स्त्रोतांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, अनेक वॉर्डात पाणी समस्या गंभीर असल्यामुळे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.शहरात तीव्र पाणी टंचाईची समस्या यावर्षी प्रथमच निर्माण झाली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन नसल्यामुळे नगर पालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. सोमनाथपूर वॉर्डात नगरसेवक राजू डोहे यांनी स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर आमदार अ‍ॅड. धोटे यांनी स्वत: पुढाकार घेत अनेक वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी आपल्या कार्यालयाच्या संपर्क क्रमांकावर नागरिकांना फोन करून पाण्याची मागणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सकाळी आणि सायंकाळी गरजेप्रमाणे वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नगर प्रशासनावरील ताण थोडा कमी झाला आहे. मात्र वर्धा नदीच्या पात्रातील पाणी कालगाव येथील इनटेक विहिरीकडे वळविण्यासाठी नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.नदीच्या पात्रात पाण्याची पातळी खाली गेल्याने पाणी मुबलक मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पर्यायी स्त्रोतांवर नागरिकांना पाणीपुरवठा करणे गरजेचे झाले आहे. या क्षेत्रात असलेल्या कोळसा व सिमेंट उद्योगांतर्गत मोठ्या प्रमाणात पाणी लागते. वर्धा नदीतून पाणी घेतले जाते. या नदीचा प्रवाह कायमम ठेवण्यासाठी किंवा पाणी उपलब्ध राहील अशी व्यवस्था करण्यासाठी बॅरेज बंधारा बांधण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र, शासनाने कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरावर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.उद्योगाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळते. मात्र, हा निधी इतरत्र वळवून येथील विकास कामांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी येथील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई