शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजुऱ्यात टँकरने पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:26 IST

सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देआमदारांचा पुढाकार : वर्धा नदी आटल्याने शहरावर जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. तसेच पर्यायी स्त्रोतांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, अनेक वॉर्डात पाणी समस्या गंभीर असल्यामुळे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.शहरात तीव्र पाणी टंचाईची समस्या यावर्षी प्रथमच निर्माण झाली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन नसल्यामुळे नगर पालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. सोमनाथपूर वॉर्डात नगरसेवक राजू डोहे यांनी स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर आमदार अ‍ॅड. धोटे यांनी स्वत: पुढाकार घेत अनेक वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी आपल्या कार्यालयाच्या संपर्क क्रमांकावर नागरिकांना फोन करून पाण्याची मागणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सकाळी आणि सायंकाळी गरजेप्रमाणे वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नगर प्रशासनावरील ताण थोडा कमी झाला आहे. मात्र वर्धा नदीच्या पात्रातील पाणी कालगाव येथील इनटेक विहिरीकडे वळविण्यासाठी नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.नदीच्या पात्रात पाण्याची पातळी खाली गेल्याने पाणी मुबलक मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पर्यायी स्त्रोतांवर नागरिकांना पाणीपुरवठा करणे गरजेचे झाले आहे. या क्षेत्रात असलेल्या कोळसा व सिमेंट उद्योगांतर्गत मोठ्या प्रमाणात पाणी लागते. वर्धा नदीतून पाणी घेतले जाते. या नदीचा प्रवाह कायमम ठेवण्यासाठी किंवा पाणी उपलब्ध राहील अशी व्यवस्था करण्यासाठी बॅरेज बंधारा बांधण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र, शासनाने कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरावर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.उद्योगाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळते. मात्र, हा निधी इतरत्र वळवून येथील विकास कामांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी येथील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई