शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी अधिकारी देणार ‘शेतकरी असल्याचा दाखला’, शेतकरी महिलांची पायपीट थांबणार

By परिमल डोहणे | Updated: April 3, 2023 11:14 IST

कृषी आयुक्तांनी काढले परिपत्रक

परिमल डोहणे

चंद्रपूर : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये महिला शेतकऱ्यांना सहभागी होताना कंपनी निबंधकाकडून शेतकरी असल्याचा दाखला घ्यावा लागत होता. या दाखल्यांसाठी महिलांना मोठी धावपळ करावी लागत होती. त्यामुळे राज्याच्या कृषी आयुक्तांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकरी महिलांना ‘शेतकरी असल्याचा दाखला’ देण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे शेतकरी महिलांची धावपळ थांबणार आहे.

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी कंपनी निबंधकाकडून (आरओसी) शेतकरी असल्याबाबतचा दाखला मागितला जातो; मात्र शेतकरी कुटुंबातील ज्यांच्या नावे शेती नाही, अशा महिला अथवा अन्य सदस्यांना शेतकरी म्हणून दाखला मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. महिलांची धावपळ अधिक होत होती. त्यामुळे कृषी आयुक्तांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ‘शेतकरी असल्याचा दाखला’ देण्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे शेतकरी महिलांची धावपळ थांबणार आहे.

केवळ कंपनी भागधारक होण्यासाठीच लागू असणारा दाखला

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी महिला शेतकऱ्यांना दिला जाणारा ‘शेतकरी असल्याचा दाखला’ हा केवळ शेतकरी उत्पादक कंपनीचा भागधारक म्हणून कंपनी सहभागी होण्यासाठी राहणार आहे. इतर कामासाठी हा दाखला लागू होणार नाही. कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे शेती असल्यास त्या कुटुंबातील कोणत्याही अन्य सदस्याला ‘शेतकरी असल्याचा दाखला’ द्यावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

राज्यात केवळ १५.४६ टक्के महिला शेतकरी

राज्यात महिलांच्या नावे जमिनीचा सात बारा असलेल्या महिला शेतकऱ्यांची संख्या सुमारे १५.४६ टक्के आहे. तर राज्यात ७९.५२ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक असल्याचे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर