शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

टाॅकीज सुरू मात्र प्रेक्षकच फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

बल्लारपूर : टॉकीज सुरू झाली. मात्र प्रेक्षकच येईना. काही कमाईही होईना, अशी गंभीर स्थिती टॉकीज मालकांची, चित्रपट व्यावसायिकांची ...

बल्लारपूर : टॉकीज सुरू झाली. मात्र प्रेक्षकच येईना. काही कमाईही होईना, अशी गंभीर स्थिती टॉकीज मालकांची, चित्रपट व्यावसायिकांची होऊन बसली आहे. प्रेेेक्षक हळूहळू येतीलच आणि डबघाईतील हा व्यवसाय परत तग धरणार या आशेने काही टॉकीज मालकांनी अशा विपरीत स्थितीत टॉकीज सुरू केल्या असून तिथे नियमित खेळ दाखवणे सुरू आहे.

कोरोनाची लाट ओसरू लागल्यानंतर टॉकीज परत सुरू करण्याची अनुमती शासनाकडून मिळाली. त्याचे काही महिन्यानंतरच जानेवारीत चंद्रपूर येथील अभय टॉकीज तसेच तसेच बहू पडदा मिराज या दोन टॉकीज सुरू झाल्या. या दोन महिन्यात प्रेक्षकांचा खूपच अल्प म्हणजे क्षमतेच्या दोन किंवा तीन टक्के प्रेक्षक असा प्रतिसाद मिळत आलेला आहे. यातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि वीज बिल भागविण्याएवढीच कमाई होत आहे. प्रेक्षकांअभावी बरेच खेळ रद्द करावे लागले. कोरोना काळात नवीन मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. काही प्रदर्शित झाले आहेत ते फक्त ओटीटीवर! त्यामुळे टॉकीजवर इंग्रजी व तामिळ भाषेतील हिंदी डब केलेले चित्रपट लावावे लागत आहेत. सलमान, शाहरुख, अक्षय कुमार या सारख्या बड्या कलाकारांचा चित्रपट लागल्यास प्रेक्षक टॉकीजकडे वाढू शकतात. पण तसा मोठा चित्रपट येत्या दोन महिन्यांपर्यंत टॉकीजमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे डब चित्रपटच लावावे लागत आहे, असे टॉकीज मालकांचे म्हणणे पडते.

बाॅक्स

टाॅकीज बंदचा असाही फटका

अभय टॉकीजचे मालक परमानंद पोटदुखे म्हणाले, प्रेक्षकांना सवय लावण्याकरिता व त्यांना परत टॉकीजकडे वळविण्याकरिता टॉकीज सुरू ठेवणे गरजेचे आहे. सोबतच लाखो-करोडो रुपये किमतीची यंत्रसामग्री खराब होऊ नये या करिता त्या चालवीत राहणे आवश्यक ठरते. टॉकीज सुरू ठेवण्याची ही दोन मुख्य कारणे आहेत.

कोरोना पूर्व काळात चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर येथे सहा टॉकीज तसेच ब्रह्मपुरी, नागभिड आणि वरोरा येथे प्रत्येकी एक अशा नऊ टॉकीज सुरू होत्या. कोरोना काळानंतर त्यातील चंद्रपुरातील अभय आणि मिराज दोनच टॉकीज या घडीला सुरू आहे. बाकी बंद आहेत.

टॉकीज बंद असल्याने तेथील कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.

शासनाच्या जाचक अटी विरोधात महाराष्ट्रातील टॉकीज व्यावसायिकांनी पाच वर्षांपूर्वी तीन महिने टॉकीज बंद ठेवल्या होत्या. बंद मागे घेतल्यानंतर नवीन चित्रपटांचे प्रदर्शन सुरू असताना सुद्धा प्रेक्षकांना परत येण्याकरिता कितीतरी महिने वाट पहावी लागली होती. आता तर नवीन चित्रपटांचे प्रदर्शन बंद आहे त्याचा जबर फटका टॉकीज व्यावसायिकांना बसत आहे.