शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विरांच्या बलिदानातून स्फूर्ती घ्या

By admin | Updated: August 17, 2016 00:33 IST

स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या. ब्रिटीश सत्तेविरूद्ध संघर्ष केला.

अहीर यांचे आवाहन : युवकांनो, देश घडवा, कृतार्थ व्हा चंद्रपूर : स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या. ब्रिटीश सत्तेविरूद्ध संघर्ष केला. अनेक अज्ञात विरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. समर्पण आणि बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवा. त्यांच्या बलिदानातून स्फुर्ती घ्या. हा देश घडण्यिाची जबाबदारी आता आपल्यावर आहे. त्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. चंद्रपूर ते आनंदवान तिरंगा जनसंवाद मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी येथील ऐतिहासिक शहीद स्वातंत्र्यवीर पुलेश्वर बाबूराव शेडमाके स्मारकस्थळावरून झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार निघालेल्या या रॅलीमध्ये असलेली युवकांची उपस्थिती आणि उत्साह लक्षणिय होता. या प्रसंगी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजपाचे प्रदेश सदस्य विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, वनिता कानडे, अंजली घोटेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्य संगा्राम सैनिक डॉ. र्इंगोले आणि निखिनकर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ना. अहीर म्हणाले, ज्या स्थळावरून या यात्रेला प्रारंभ होत आहे, ते पवित्र आणि प्रेरणादायी स्थळ आहे. मिळालेले स्वातंत्र चिरायु आणि अबाधित ठेवण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण खर्ची घालावा लागणार आहे. त्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या सवर स्तरातील नागरिकांचे आयुष्यामान सुधारण्यासाठी पंतप्रधानांनी योजना आखल्या आहेत. देशात कुणी अर्धपोटी राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कुठलीही तडजोड स्विकारणार नाही. काश्मिर प्रश्नावर नाही तर यापुढे पाकव्याप्त काश्मिरावर चर्चा होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.ना. मुनगंटीवार युवकांना म्हणाले, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या विरांचा सन्मान करून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी सज्ज व्हा. त्यांचे बलिदान आपल्यामुळे वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. देशाच्या प्रगतीसाठी एकसंघ प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी पुढे या. आमदार नाना श्यामकुळे यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.वरोऱ्यात समारोपचंद्रपुरातून निघालेल्या या रॅलीचा समारोप वरोऱ्यातील आशिर्वाद मंगल कार्यालयात झाला. वरोरामध्ये रॅली पोहचल्यावर विविध वॉर्डात फिरून सभास्थळी पोहचली. ना. अहीर यांच्या हस्ते वरोरा शहरातील माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी झालेल्या मार्गदर्शनातून त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या नरविरांच्या त्यागाचा सन्मान करण्याचे आवाहन केले. तरूणाईने राष्ट्राच्या उभारणीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)ठिकठिकाणी स्वागतचंद्रपूर ते वरोरा मार्गात या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ना. अहीर स्वत: रॅलीत दुचाकीवर सहभागी होते. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह भरला होता. चंद्रपुरातील हुतात्मा स्मारकावर मानवंदना देवून रॅली पडोली चौकात पोहचली. तिथे भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर पांढरकवडा फाटा, धानोरा मार्गे घुग्घुस येथील गांधी चौकात पोहचल्यावर सभेत रूपांतर झाले. पुढे म्हातारदेवी, साखरवाही, घोडपेठ येथील स्वागत स्विकारून भद्रावतीमधील स्मारक चौकात सभा झाली. त्यानंतर नंदोरीतही स्वागत झाले. वरोराला रॅलीचा समारोप झाला.पावसावर मातरॅलीला सुरूवात झाली तेव्हा सावरकर चौकात पावसाला सुरूवात झाली. मात्र कार्यकर्त्यांचा आणि युवकांचा उत्साह अफाट होता. पावसावर मात करून रॅली निघाली.