शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

विरांच्या बलिदानातून स्फूर्ती घ्या

By admin | Updated: August 17, 2016 00:33 IST

स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या. ब्रिटीश सत्तेविरूद्ध संघर्ष केला.

अहीर यांचे आवाहन : युवकांनो, देश घडवा, कृतार्थ व्हा चंद्रपूर : स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्या. ब्रिटीश सत्तेविरूद्ध संघर्ष केला. अनेक अज्ञात विरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. समर्पण आणि बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवा. त्यांच्या बलिदानातून स्फुर्ती घ्या. हा देश घडण्यिाची जबाबदारी आता आपल्यावर आहे. त्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. चंद्रपूर ते आनंदवान तिरंगा जनसंवाद मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी येथील ऐतिहासिक शहीद स्वातंत्र्यवीर पुलेश्वर बाबूराव शेडमाके स्मारकस्थळावरून झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार निघालेल्या या रॅलीमध्ये असलेली युवकांची उपस्थिती आणि उत्साह लक्षणिय होता. या प्रसंगी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजपाचे प्रदेश सदस्य विजय राऊत, मनपा गटनेते अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, वनिता कानडे, अंजली घोटेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्य संगा्राम सैनिक डॉ. र्इंगोले आणि निखिनकर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ना. अहीर म्हणाले, ज्या स्थळावरून या यात्रेला प्रारंभ होत आहे, ते पवित्र आणि प्रेरणादायी स्थळ आहे. मिळालेले स्वातंत्र चिरायु आणि अबाधित ठेवण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण खर्ची घालावा लागणार आहे. त्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या सवर स्तरातील नागरिकांचे आयुष्यामान सुधारण्यासाठी पंतप्रधानांनी योजना आखल्या आहेत. देशात कुणी अर्धपोटी राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कुठलीही तडजोड स्विकारणार नाही. काश्मिर प्रश्नावर नाही तर यापुढे पाकव्याप्त काश्मिरावर चर्चा होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.ना. मुनगंटीवार युवकांना म्हणाले, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या विरांचा सन्मान करून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी सज्ज व्हा. त्यांचे बलिदान आपल्यामुळे वाया जाणार नाही, याची काळजी घ्या. देशाच्या प्रगतीसाठी एकसंघ प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी पुढे या. आमदार नाना श्यामकुळे यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.वरोऱ्यात समारोपचंद्रपुरातून निघालेल्या या रॅलीचा समारोप वरोऱ्यातील आशिर्वाद मंगल कार्यालयात झाला. वरोरामध्ये रॅली पोहचल्यावर विविध वॉर्डात फिरून सभास्थळी पोहचली. ना. अहीर यांच्या हस्ते वरोरा शहरातील माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी झालेल्या मार्गदर्शनातून त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या नरविरांच्या त्यागाचा सन्मान करण्याचे आवाहन केले. तरूणाईने राष्ट्राच्या उभारणीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)ठिकठिकाणी स्वागतचंद्रपूर ते वरोरा मार्गात या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ना. अहीर स्वत: रॅलीत दुचाकीवर सहभागी होते. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह भरला होता. चंद्रपुरातील हुतात्मा स्मारकावर मानवंदना देवून रॅली पडोली चौकात पोहचली. तिथे भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर पांढरकवडा फाटा, धानोरा मार्गे घुग्घुस येथील गांधी चौकात पोहचल्यावर सभेत रूपांतर झाले. पुढे म्हातारदेवी, साखरवाही, घोडपेठ येथील स्वागत स्विकारून भद्रावतीमधील स्मारक चौकात सभा झाली. त्यानंतर नंदोरीतही स्वागत झाले. वरोराला रॅलीचा समारोप झाला.पावसावर मातरॅलीला सुरूवात झाली तेव्हा सावरकर चौकात पावसाला सुरूवात झाली. मात्र कार्यकर्त्यांचा आणि युवकांचा उत्साह अफाट होता. पावसावर मात करून रॅली निघाली.