शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: July 28, 2014 23:28 IST

कृषी ग्राहकावरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी चालु कृषी ग्राहकांना त्यांच्या

सवलत मिळणार : सुभाष धोटे यांचे आवाहनराजुरा : कृषी ग्राहकावरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी चालु कृषी ग्राहकांना त्यांच्या ३१ आॅगस्टपर्यंतच्या मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हफ्त्यात भरली तर, उरलेली ५० टक्के मुळ थकित रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे महावितरणाला रोखीने व समप्रमाणात अनुदान स्वरूपात अदा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषि ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ पर्यंत थकित असलेले पूर्ण व्याज व दंड हे वितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याची विनंती आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.या योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांना ५० टक्के मुळ थकबाकीची रक्कम तीन हफ्त्यात भरावयाची आहे. यात कमीत कमी २० टक्के ३१ आॅगस्टपर्यंत, २० टक्के रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत व उरलेली १० टक्के रक्कम ३१ आॅक्टोबरपर्यंत भरावयाची आहे किंवा ५० टक्के मुळ थकबाकी एकरकमी ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी भरता येवू शकते. या योजनेचा लाभ घेण्याची विनंती आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. योजनेत सहभागी कृषी ग्राहकांना १ एप्रिल २०१४ नंतरची सर्व चालू वीज बिले नियमित भरणा करणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत जे ग्राहक थकबाकीदार नाहीत अशा ग्राहकांची पुढील दोन त्रिमासिक बिलाची ५० टक्के रक्कम माफ करण्यात येतील व माफ केलेली रक्कम शासनाकडून महावितरणला अनुदान रूपात अदा होणार आहे.ज्या कृषी ग्राहकाने योजनेत सहभाग घेतला नाही, योजनेअंतर्गत ठरविण्यात आलेल्या रक्कमेचा भरणा केला नाही अशा कृषी ग्राहकांना योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. व्याज व दंडासहित पूर्ण रक्कम पूनश्च ग्राहकाच्या खात्यात दर्शविल्या जाणारा आहे. विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसुलीकरिता कार्यवाही होणार आहे. सदर योजना शेतकऱ्यावरील थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनी घेण्याची विनंती आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)