शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

गोडधोड दूरच, दोनवेळच्या जेवणाची वाढली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. याच शासनाच्या मदतीवर त्यांचा चरितार्थ चालतो; मात्र यामध्ये अनियमितता असल्याने त्यांचे सध्या बेहाल सुरु आहेत.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निराधारांना जगण्यासाठी अडचण येऊ नये, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. योजना चांगल्या असल्या तरी  नियमित आणि वेळेवर मानधनच दिले जात नसल्याने या निराधारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकतर अल्प मानधन त्यातच अनियमितता असल्यामुळे त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळी असतानाही सध्यस्थितीत त्यांना सध्या खाण्याची चिंता सतावत आहे.जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. याच शासनाच्या मदतीवर त्यांचा चरितार्थ चालतो; मात्र यामध्ये अनियमितता असल्याने त्यांचे सध्या बेहाल सुरु आहेत. विशेषत: संजय गांधी निराधार योजनेचे ऑगस्ट महिन्यापासून  तसेच श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेचे मागील तीन महिन्यांपासून मानधनच आले नाही. परिणामी लाभार्थी शासकीय कार्यालय तसेच बँकांमध्ये चकरा मारून आता ठकले आहेत. जास्त तर नाहीच पण आहे ते तरी मानधन नियमित द्या, अशी आर्त हाक सध्या ते करताना दिसत आहेत.

अनेकांना अडचणउतारवयात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना तसेच निराधारांना शासनाच्या निराधार योजनांचाच आधार असतो. सणवार, औषधोपचार आणि इतर खर्च कसेबसे करीत यातून भागवितात; मात्र मानधन अनियमित मिळत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या दिवसात तरी मानधन मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे; मात्र अद्यापही काही योजनांचे तीन-तीन महिन्यांपासून अनुदानच आले नाही. त्यामुळे दिवाळी सणाचा सर्वत्र झगमगाट असताना निराधारांना हा सण अंधारातच घालवावा लागण्याची शक्यता आहे.

शासनाकडून अनुदान आल्यानंतर ते लाभार्थ्यांना वितरित केले जाते. मागील काही महिन्यांमध्ये काही योजनांतील लाभार्थ्यांचे अनुदान आले नसल्याने ते वितरित झाले नाही. अनुदानासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.- डाॅ. कांचन जगतापतहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021