शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

गोडधोड दूरच, दोनवेळच्या जेवणाची वाढली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. याच शासनाच्या मदतीवर त्यांचा चरितार्थ चालतो; मात्र यामध्ये अनियमितता असल्याने त्यांचे सध्या बेहाल सुरु आहेत.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निराधारांना जगण्यासाठी अडचण येऊ नये, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. योजना चांगल्या असल्या तरी  नियमित आणि वेळेवर मानधनच दिले जात नसल्याने या निराधारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकतर अल्प मानधन त्यातच अनियमितता असल्यामुळे त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळी असतानाही सध्यस्थितीत त्यांना सध्या खाण्याची चिंता सतावत आहे.जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. याच शासनाच्या मदतीवर त्यांचा चरितार्थ चालतो; मात्र यामध्ये अनियमितता असल्याने त्यांचे सध्या बेहाल सुरु आहेत. विशेषत: संजय गांधी निराधार योजनेचे ऑगस्ट महिन्यापासून  तसेच श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेचे मागील तीन महिन्यांपासून मानधनच आले नाही. परिणामी लाभार्थी शासकीय कार्यालय तसेच बँकांमध्ये चकरा मारून आता ठकले आहेत. जास्त तर नाहीच पण आहे ते तरी मानधन नियमित द्या, अशी आर्त हाक सध्या ते करताना दिसत आहेत.

अनेकांना अडचणउतारवयात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना तसेच निराधारांना शासनाच्या निराधार योजनांचाच आधार असतो. सणवार, औषधोपचार आणि इतर खर्च कसेबसे करीत यातून भागवितात; मात्र मानधन अनियमित मिळत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या दिवसात तरी मानधन मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे; मात्र अद्यापही काही योजनांचे तीन-तीन महिन्यांपासून अनुदानच आले नाही. त्यामुळे दिवाळी सणाचा सर्वत्र झगमगाट असताना निराधारांना हा सण अंधारातच घालवावा लागण्याची शक्यता आहे.

शासनाकडून अनुदान आल्यानंतर ते लाभार्थ्यांना वितरित केले जाते. मागील काही महिन्यांमध्ये काही योजनांतील लाभार्थ्यांचे अनुदान आले नसल्याने ते वितरित झाले नाही. अनुदानासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात आली असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.- डाॅ. कांचन जगतापतहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021