शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:13 PM

शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देदोन दिवसांचा अल्टिमेटम : महिलांचा नगर परिषदेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.नगरसेविका चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन मुख्यधिकारी व नगराध्यक्ष अहतेशम अली यांना दिले. सदर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.वरोरा नगर परिषद ही शेकडो वर्ष जुनी असूनसुद्धा नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. नगर परिषदेत आजपर्यंत अनेक पक्षाच्या सत्ता बसल्या. मात्र नागरिकांच्या मुलभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाही. काही प्रभागामध्ये उन्हाळा येण्याआधीच पाणी समस्येने डोके वर काढले असून खांजी वॉर्ड येथे मागील एक महिन्यापासून व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने थंडीच्या दिवसात नागरिकांचे घसे कोरडे पडले आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात पाणी टंचाईविरोधात नगर परिषदेवर एल्गार करीत शेकडो महिलांसह मोर्चा काढून मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख व नगराध्यक्ष अहतेशाम अली यांना निवेदन देवून समस्या सोडविण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा समस्येचे निराकरण न झाल्यास मटका फोड आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका चिमूरकर यांनी दिला.वरोरा क्षेत्रामध्ये सुरु झालेली पाणी पुरवठा योजना ही १९७४ सालची असल्याने आताचा वाढलेला शहराचा भाग व मागणी आणि पुरवठा याचा तुटवडा पडला असल्याने बºयाच ठिकाणी अशा अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे पाण्याची टाकी पूर्ण भरली जात नसल्याने बºयाच भागात पाणी फोर्सने जात नाही. त्यामुळे पाणी पोहचत नसल्याने ही अडचण येत आहेफ. पाणी पुरवठा एक दिवस आड दिल्याने सर्व भागात बरोबर पाणी मिळेल. यासाठी १ फेब्रुवारीपासून त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल.- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी.