शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

चार सोसायट्यांमधील धान खरेदी अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देजागा व बारदान्याचा अभाव : शेतकऱ्यांमध्ये नाराजी

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा पणन महासंघ व आदिवासी सोसायट्यांमध्ये धानाला जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीचा कल सोसायट्यांकडे वाढला आहे. नागभीड तालुक्यात आतापर्यंत आठ आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रामार्फत धान खरेदी सुरू होती. मात्र बारदान्याअभावी दोन आदिवासी सोसायट्यांनी तर पणन महासंघाच्या दोन केंद्रांनी धान खरेदी बंद केली आहे.नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे.शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव एक हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे.दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्राकडे वळविला आहे. मात्र गोविंदपूर सोसायटीने बारदाना उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी बंद केली आहे. तर सावरगाव सोसायटीने धान ठेवण्यासाठी जागा आणि बारदानाही उपलब्ध नसल्याने धान खरेदी बंद केली असल्याची माहिती संबंधित सुत्राने दिली आहे.नागभीड व कोर्धा केंद्र बंदपणन महासंघाकडून नागभीड व कोर्धा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र १३ दिवसांपासून बारदान्याअभावी या दोन्ही केंद्रांची धान खरेदी बंद आहे. याठिकाणी बारदाना हा कलकत्ता येथून येतो, अशी माहिती आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही दोन्ही केंद्रे अतिशय महत्त्वाची आहेत. विचारणा करण्यासाठी शेतकरी याठिकाणी येत असले तरी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.चुकारेही अडलेधानाची खरेदी झाल्यानंतर सात दिवसात शेतकºयांना सात दिवसात चुकारे दिल्या गेले पाहिजे, असा नियम असल्याचे समजते. मात्र नागभीड केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून चुकारेच दिल्या गेले नाही. ४ जानेवारी रोजी याठिकाणी शेवटचा पेमेंट आला होता. त्यानंतर पेमेंटच आले नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड