शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चार सोसायट्यांमधील धान खरेदी अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देजागा व बारदान्याचा अभाव : शेतकऱ्यांमध्ये नाराजी

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा पणन महासंघ व आदिवासी सोसायट्यांमध्ये धानाला जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीचा कल सोसायट्यांकडे वाढला आहे. नागभीड तालुक्यात आतापर्यंत आठ आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रामार्फत धान खरेदी सुरू होती. मात्र बारदान्याअभावी दोन आदिवासी सोसायट्यांनी तर पणन महासंघाच्या दोन केंद्रांनी धान खरेदी बंद केली आहे.नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे.शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव एक हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे.दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्राकडे वळविला आहे. मात्र गोविंदपूर सोसायटीने बारदाना उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी बंद केली आहे. तर सावरगाव सोसायटीने धान ठेवण्यासाठी जागा आणि बारदानाही उपलब्ध नसल्याने धान खरेदी बंद केली असल्याची माहिती संबंधित सुत्राने दिली आहे.नागभीड व कोर्धा केंद्र बंदपणन महासंघाकडून नागभीड व कोर्धा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र १३ दिवसांपासून बारदान्याअभावी या दोन्ही केंद्रांची धान खरेदी बंद आहे. याठिकाणी बारदाना हा कलकत्ता येथून येतो, अशी माहिती आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही दोन्ही केंद्रे अतिशय महत्त्वाची आहेत. विचारणा करण्यासाठी शेतकरी याठिकाणी येत असले तरी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.चुकारेही अडलेधानाची खरेदी झाल्यानंतर सात दिवसात शेतकºयांना सात दिवसात चुकारे दिल्या गेले पाहिजे, असा नियम असल्याचे समजते. मात्र नागभीड केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून चुकारेच दिल्या गेले नाही. ४ जानेवारी रोजी याठिकाणी शेवटचा पेमेंट आला होता. त्यानंतर पेमेंटच आले नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड