शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

युती शासनाकडून विद्यार्थ्यांची चेष्टा

By admin | Updated: April 24, 2015 00:53 IST

दुष्काळग्रस्त भागाला तत्परतेने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या युती शासनाने विद्यार्थ्यांचीही चेष्टा केली आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरदुष्काळग्रस्त भागाला तत्परतेने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या युती शासनाने विद्यार्थ्यांचीही चेष्टा केली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याची शासनाने घोषणा केली खरी मात्र, अद्यापपर्यंत एक दमडीही विद्यार्थ्यांच्या हातात पडलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त घोषित झालेल्या ३९३ गावांतील दहावी व बारावीच्या २६७७ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ स्वरूपात १४ लाख ५८ हजार ८२५ रूपये शासनाकडून येणे आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या कचाट्यात सापडल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा आहे. काही प्रमाणात मदत मिळाली असली तरी मिळणारी मदत ही तुटपुंजी ठरत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणे गरजेचे आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याला परीक्षा फीची रक्कम परत मिळालेली नाही. नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर तब्बल १४ लाख ५८ हजार रूपये शासनाकडून येणे बाकी आहे. शासकीय मदत वाटप करताना वेळ खाऊपणा होत असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परीक्षा फी माफीचा निर्णय झाल्यानंतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली. परंतु, शासन अद्यापही फी परत करण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी चक्रव्यूहात अडकलेल्या नागरिकांना वेळेत मदत मिळाली तर त्या मदतीचा लाभ होईल. परंतु, उशिरा मदत देऊन मदतीतही चालढकलपणा करण्याचे धोरण सध्या शासनाकडून सुरु आहे. दहावी परीक्षेसाठी ३०० रूपये तर बारावीच्या परीक्षेसाठी कला अभ्यासक्रमाला ४३० आणि विज्ञान अभ्यासक्रमासाठी ४४५ रूपये परीक्षा शुल्क घेण्यात आले. याचे १४ लाख ५८ हजार रूपये येणे आहेत.