शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

गावकऱ्यांच्या वादात अडकली माथरा पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: May 8, 2015 01:10 IST

शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविते. शासकीय योजना निट राबविली तर गावाच्या विकासात योजना सार्थकी लागते.

गोवरी : शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविते. शासकीय योजना निट राबविली तर गावाच्या विकासात योजना सार्थकी लागते. मात्र गावकऱ्यांनी केलेल्या मोटरपंप स्विचरूमच्या वादात गावकऱ्यांनाच पाणीपुरवठा नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ माथरावासीयांवर आल्याने नागरिकांना दारोदार पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राजुरा तालुक्यातील माथरा हे राजुरा-कवठाळा मुख्य मार्गावरील ६७० लोकसंख्या असलेले गाव. या गावात दोन-तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाण्याची टाकी मंजूर होऊन बांधकामाला सुरूवात झाली. ग्रामपंचायतीने यासाठी भूमिगत पाईपलाईन गावात टाकली. पाणी पुरवठा नळयोजनेचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणार असल्याने महिलांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबणार, याचा आनंद गावकऱ्यांना होता. पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाल्यामुळे नागरिकांना लवकरच नळयोजनेचे पाणी मिळेल, अशी आस होती.मात्र पाणी पुरवठा नळयोजनेच्या मोटारपंपाचे स्विचरूम नेमके कोणत्या ठिकाणी बांधावे, यासाठी गावकऱ्यांत वाद झाला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात स्विचरूम बांधकाम करण्यासाठी जागा निश्चित करून बांधकामाला सुरूवात झाली. मात्र गावातील काही लोकांनी याला विरोध करीत मंदीर आणि शाळेच्या आवारात बांधकाम होऊ द्यायचे नाही, असा पवित्रा घेतला. याच वादाच्या ठिणगीला राजकीय स्पर्श झाल्याने गावकऱ्यांनी मोटरपंप स्विचरूमसह पाण्याच्या टाकीचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.गावकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेले पाणी गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या वादात दूर पळवून नेल्यामुळे चांगली योजना असूनही गावकऱ्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. हे माथरावासीयांचे दुदैव आहे. माथरा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. त्यामुळे या गावाचा कारभार खामोना ग्रामपंचायतीतून चालतो. खामोना गावाला सरपंच तर माथरा गावाला उपसरपंच मिळाला. गाव पातळीवर मिनीमंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाचे दोन लोकप्रतिनिधी दोन गावाला मिळाले. मात्र विकासनिधी खेचून आणण्यात ते अपयशी ठरल्यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसली आहे.माथरा गावात सदर प्रतिनिधीने फेरफटका मारला असता गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शेणखतांचे ढिगारे रस्त्यावर असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर घाण साचते. त्यामुळे गावात विकासकामांचा खेळखंडोबा झाला आहे. (वार्ताहर)