शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रस्त्याच्या कामात चोरीचा मुरुम

By admin | Updated: April 29, 2015 01:18 IST

नांदा ते राजुरगुडा या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूरग्रस्त निधीतून पाच लाख रुपये खर्चून करण्यात येत आहे.

चंद्रपूर : नांदा ते राजुरगुडा या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूरग्रस्त निधीतून पाच लाख रुपये खर्चून करण्यात येत आहे. मात्र या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या लाल मातीमिश्रीत चोरीच्या मुरुमाचा वापर होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या कामाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ठेकेदार इस्टिमेटनुसार काम करीत नसून त्यातून जिल्हा परिषदेच्या बांधकाम अभियंत्याचेही चांगलेच फावत आहे. या अगोदरचसुद्धा नांदा- पिंपळगाव या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. २० लाख रुपयांच्या पूरग्रस्त निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या क्षेत्राच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सरोज मुनोत यांना गावकऱ्यांनी या कामाबाबत कल्पना दिली असता त्यांनीसुद्धा २१ एप्रिलला रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या कामात दोष आढळून आल्याने सदर कंत्राटदारावर कारवाई मागणी केलेली आहे.नांदा ग्रामपंचायत ही पेसाअंतर्गत येते. या ठिकाणी नाल्यातून रेतीचे व लाल मातीचे अवैधरीत्या उत्खनन होत आहे. मात्र सरपंच व सचिवाच्या दुर्लक्षतेमुळे ग्रामपंचायतीचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)रस्त्याला सिमेंटीकरणाची प्रतीक्षागडचांदूर : माणिकगड सिमेंट कंपनी प्रवेशद्वार ते पेट्रोलपंप चौक तसेच रेल्वे क्रॉसिंग ते सावित्रीबाई फुले महाविद्यालय चौक पावेतो रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात आहे. मात्र दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खड्डे पडले आहे. या रस्त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. दोन्ही बाजूला ट्रकच्या रांगा असतात. त्यामुळे नेहमी अपघात होतात. औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहरात माणिकगड सिमेंट उद्योग असून त्याचाच विस्तारित दुसरा प्रकल्प पूर्ण झाला आहे. जवळच अंबुजा, अल्ट्राटेक, मुरली सिमेंट प्रकल्प आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन सिमेंट ट्रक, कोळसा ट्रक व इतर वाहने दिवसरात्रं जात असतात नागरिकांची वर्दळसुद्धा याच मार्गाने असते. या रस्त्यावर आजपर्यंत बरेच अपघात झाले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शनिवार दोन तरुणांना जीव गमवावा लागला. या रस्त्याचे चौपदरीकरण करुन सुशोभिकरण करण्याची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व माणिकगड सिमेंट कंपनी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यास तयार आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग परवानगी देत नसल्याने हे काम रखडले आहे. माणिकगड ने या रस्त्याने अंदापत्रक शासनाकडे पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे असे आहे की, कंपनीने शासनाकडे रक्कम जमा करावी त्यानंतर सा.बां. विभाग रस्त्याचे काम करेल. या दोघांच्या वादात गडचांदूरकरांचे हाल होत आहेत. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी यांनी याकडे लक्ष देऊन रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.