शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पटेलांनी उचलले पाऊल; निजाम स्टेट भारतात विलीन

By admin | Updated: October 31, 2015 01:59 IST

भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व वा त्यानंतर बल्लारपूर-चंद्रपूर या भागात येऊन गेले, ...

वर्धा नदीच्या दुधोली रेल्वे पुलावर : झाली होती युद्ध सदृष्य कारवाईवसंत खेडेकर बल्लारपूरभारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व वा त्यानंतर बल्लारपूर-चंद्रपूर या भागात येऊन गेले, वा नाही, हे माहित नाही. पण, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील विखरुन असलेल्या सर्वच लहान मोठ्या संस्थानिकांना भारतात विलीन करून अखंड भारत करण्याकरीता त्यांनी उघडलेल्या मोहिमेला प्रतिसाद न देणाऱ्या हैदराबादच्या निजामाविरुद्ध कारवाई करण्याचा त्यांनी दिलेला कठोर आणि निर्णायक आदेश या भागात अमलात आला. गृहमंत्रालयाने केलेली बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील दुधोली रेल्वे पुलावरील पोलीस अ‍ॅक्शन यशस्वी झाली आणि निजाम स्टेट भारतात विलीन झाले. त्यामसयी भारत आणि निजाम स्टेटच्या सीमावर्ती भागात काय म्हणून आनंद झाला! त्याचे वर्णन तो आनंद बघणारे, प्रत्यक्ष अनुभव घेणारे सांगतात.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजाम स्टेट भारताशी तुटून होता. निजाम आपल्या स्टेटला भारताचा भाग मानतच नव्हता. त्याचा विचार स्वतंत्र राहायचे वा आपल्या स्टेटला पाकिस्तानशी जोडायचे, असा होता. यामुळे निजाम स्टेट आणि भारत ही दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत, असा व्यवहार या दोहोंच्या सीमेवर चालायचा. वर्धा नदीच्या अलिकडील बल्लारपूर हे शहर भारतात, तर नदीपलीकडील राजुरा हे निजाम स्टेटमध्ये अशी स्थिती होती. निजाम आणि भारताला वाहतुकीने जोडणारा विदर्भ भागात दुधोली हा रेल्वे पूल होता. दोनही भागात वेगवेगळ्या देशांप्रमाणे सीमेवर गाड्यांची तपासणी व्हायची. नियामावर त्याचे विलीनीकरण भारतात करण्याची कारवाई होण्याच्या काही दिवसांपूर्वी पासून भारतीय सैन्यानी जमवाजमव बल्लारपूर आणि दुधोली पुलाजवळ नदीकाठी झाली. सैन्य छावणी उभारली गेली होती. पावसाचे दिवस असल्याने नदीचे पाणी पिण्या योग्य नव्हते. त्यामुळे जवानांकरिता बल्लारशाह रेल्वे स्थानकावरुन गाडीने पाणी पोहचविले जायचे. सप्टेंबरचा महिना, गणेशोत्सव सुरू होता. निजामाविरुद्ध पोलीस कारवाई (पोलीस अ‍ॅक्शन असे या कारवाईचे नाव) करण्याचा निर्णय झाला. निजामाकडे रजाकार नावाचे सैन्य होते. त्यांनी सीमावर्ती भागात बराच उत्पाद मांडला होता. ते सीमेवर पहारा देत. कारवाईच्या दिनी रेल्वे पुलावर रेल्वे मालगाडीचा आडोसा घेत भारतीय जवानांनी चाल करायचे असे ठरले. त्यानुसार मालगाडीच्या चाकांसह भारतीय जवान पुलावरुन निजामच्या दिशेने हळूहळू सरकू लागले. ही बाब पलिकडील रजाकारांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीच्या इंजीनच्या दिशेने गोळ्या झाडणे सुरू केले. या गोळ्यांच्या माऱ्याने गाडीचा ड्रायव्हर घाबरला आणि विचलीत होऊन गाडी मागे घेऊ लागला. ही बाब लक्षात येताच दुसऱ्या ड्रायव्हरने त्याला बाजून करुन इंजीनचा ताबा घेतला आणि मोठ्या हिंमतीने रजाकारांच्या फैरी समोरुन सुरू असतानाही इंजीनला पुढे नेते. पूल पार केल्यानंतर व निजामाच्या हद्दीत पोहचल्यानंतर भारतीय जवान रजाकांवर तुटून पडले आणि पुढे पुढे सरकत जात मोहिम यशस्वी झाली. अशाप्रकारे निजाम भारतात विलीन झाले. सरदार पटेल यांचे कठोर पाऊल उचलून निजामला भारतात विलीन केले. तसे झाले नसते तर बल्लारपूर- राजुरा भागात वेगळीच स्थिती राहिली असती. म्हणूनच सरदार पटेल यांचे आभार मानावे तेवढे कमीच !