शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

राज्याचे मंत्रालय, मिनी मंत्रालयाच्या पाठिशी उभे राहणार

By admin | Updated: April 4, 2017 00:38 IST

जिल्हयाच्या ग्रामीण भागातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत पूर्ण बहुमतासह जिल्हा परिषदेची सत्ता सोपविली.

सुधीर मुनगंटीवार : ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याची सूचनाचंद्रपूर : जिल्हयाच्या ग्रामीण भागातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत पूर्ण बहुमतासह जिल्हा परिषदेची सत्ता सोपविली. जनतेच्या या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरवत चंद्रपूर जिल्हा परिषद जनतेच्या सर्व आशा आकांक्षांची पूर्तता करणारी आदर्श जिल्हा परिषद ठरेल यादृष्टीने जनतेची सेवा करण्याचे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या या जिल्हा परिषदेच्या पाठिशी महाराष्ट्राचे मंत्रालय खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज सोमवारी जि.प. अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, फार पूर्वीच्या काळात जिल्हा परिषदांचे काम कमीशन मोडवर चालायचे. आता जनतेने जिल्हा परिषदांची सत्ता भाजपाकडे सोपविली आहे. त्यामुळे आता मिशन मोडवर काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जी लाल दिव्याची गाडी मिळाली आहे, ती आपला सन्मान वाढविण्यासाठी नसून दीन, दुर्बल, शोषित, पिडीत नागरिकाचा सन्मान वाढावा, यासाठी आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या मतदार संघातील नागरिकांना आपला अभिमान वाटेल, असे काम करावे. जिल्हा परिषदेत बसताना सर्वसामान्य माणुस आपल्या डोळयासमोर कायम ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.जनतेच्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जिल्?हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम राबवत जिल्हा परिषदेचे फिरते कार्यालय स्थापन करण्याची सूचना ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. सी.एस.आर. च्या माध्यमातुन या कार्यालयासाठी बस आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. विविध प्रकारचे दाखले, शाळेच्या समस्या, पेयजल समस्या अशा अनेक समस्या ग्रामीण भागातील नागरिकांना सातत्याने भेडसावत असतात. या समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल, असेही ते म्हणाले. हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिला उपक्रम ठरेल व तो मान चंद्रपूर जिल्हा परिषदेने प्राप्त करावा, असेही त्यांनी सुचित केले. महाराष्ट्राचे तसेच केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार आहेत. ते प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी कार्य करणे गरजेचे आहे. जनसामान्यांच्?या प्रश्नांशी संबंधित अनेक फाईल्स प्रलंबित असतात. त्यांचा जलदगतीने निपटारा व्हावा यादृष्टीने फाईल ट़्रॅकींग पध्दत विकसित करावी. त्या माध्यमातुन सात दिवसापेक्षा काळ एकही फाईल प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक सोमवारी अधिकारी व पदाधिकारी यांनी मुख्यालयी राहावे व जनतेच्या समस्या सोडवाव्या तसेच जिल्हा परिषद आणि सभापतींनी आठवडयात एकदा प्रत्येक तालुक्यातील संवर्ग विकास अधिकारी कार्यालयात बसून जनसंपर्क करावा व नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. जिल्हा परिषदेचे कामकाज लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा डिजीटल करण्यासाठी आपण हाती घेतल्या आहेत. मानव विकास मिशनच्या माध्यमातुन शिक्षणासाठी आपण भरीव मदत करू, पर्यावरणयुक्त गाव योजनेसाठी वनविभागाच्या माध्यमातुन मदत करू, असेही ते म्हणाले. २०२१ पर्यंत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात भाजी क्लस्टर, हळदी क्लस्टर असे विविध प्रकारच्या क्लस्टर्स आपण विकसित करणार आहोत. अशा पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया आपल्याला पुढे न्यायची आहे. हा जिल्हा देशातील मॉडेल जिल्हा व्हावा, या जिल्हा परिषदेच्या योजना पथदर्शी व्हाव्या, अशी अपेक्षा यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचीही उपस्थिती होती. ना. हंसराज अहीर यांनी जिल्?ा परिषद अध्?ाक्ष व सदस्यांना जनसमस्या सोडविण्याच्या प्रक्रियेमध्ये झोकुन देत उल्लेखनिय कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आ. नाना शामकुळे, आ. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंग, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदींसह सर्व जिल्हा परिषद सदस्य, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठया संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)