शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

राज्य विधिमंडळ समितीच्या धसक्याने फायलींंवरील धूळ झटकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

चंद्रपूर : राज्यातील २५ आमदारांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीचे गुरुवारी जिल्ह्यात आगमन होणार आहे. ...

चंद्रपूर : राज्यातील २५ आमदारांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीचे गुरुवारी जिल्ह्यात आगमन होणार आहे. ही समिती जिल्हास्थळी तीन दिवस राहून रोजगार हमी योजनांच्या कामांची फलश्रुती तपासणार आहे. शिवाय, सध्या गाजत असलेल्या ब्रह्मपुरीसह अन्य तालुक्यांतील वादग्रस्त कामांचीही चौकशी करू शकते. दरम्यान, समितीच्या धसक्याने जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने बुधवारी फायलींंवरील धूळ झटकून रेकॉर्ड अपडेट केल्याची माहिती आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये विधान परिषद व विधानसभेच्या २५ आमदारांचा समावेश आहे. या समितीचा फोकस मनरेगा व रोहयो कामांवरच राहणार आहे. जिल्ह्यातील विविध कामांची चौकशी करून हा अहवाल विधिमंडळ सभागृहाला सादर केला जातो. समितीचा अभ्यास अहवाल गोपनीय राहत असल्याने मनरेगा आणि रोहयोच्या वादग्रस्त कामांमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चार वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी तालुक्यात झालेल्या मनरेगातील ७७ कामांपैकी ६७ कामांना लाखोंच्या निधीचे हस्तांतरण झाले. या कामांबाबत अनियमितता व भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या. प्रशासनाने या कामांचा निधी रोखून धरला होता. मात्र, दोन महिन्यांतच वादग्रस्त कामांच्या निधीसाठी तातडीने हालचाली करून पंचायत समितीला हा निधी हस्तांतरण करण्यात आला. या कामांपैकी १४ कामांचे मस्टरच उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, ३३ कामांचा ताळेबंद जुळत नसतानाही निधी वितरित करण्याचा खटाटोप करण्यात आला. असा प्रकार अन्य तालुक्यांतही घडला, असा आरोप होत आहे. या प्रकरणाचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स

अधिकाऱ्यांच्या माहितीवर भिस्त नको !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रस्ते, सिमेंट बंधारे व रोपवाटिका व अन्य कामे करण्यात आली. यांपैकी काही कामे प्रत्यक्षात झाली नसताना कागदोपत्री दाखविल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. विधानमंडळ रोजगार हमी योजना समितीने केवळ अधिकाऱ्यांच्या माहितीवर अवलंबून न राहता वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गावकऱ्यांशीही थेट संवाद साधवा, अशी अपेक्षा विधायक दृष्टी असणाऱ्या काही सरपंचांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.

बॉक्स

कोरोनाकाळातील रोजगारात तफावत

कोरोना लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील काही तालुक्यात रोहयो कामांनी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार दिला होता. या कामांची व्याप्ती वाढविण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, काही तालुक्यांत मागणीनुसार काम उपलब्ध झाले नाही. परिणामी, नागरिकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. त्यांच्या कुटुंबांची प्रचंड ससेहोलपट झाली. यासाठी जबाबदार कोण, याचाही समितीने शोध घ्यावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

बॉक्स

असा आहे समितीचा दौरा

गुरुवारी पहिल्या दिवशी ऊर्जानगर येथील हिराई विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधींसोबत रोहयो व मनरेगाबाबत चर्चा केल्यानंतर कामांना भेटी देईल. शुक्रवारीदेखील जिल्ह्यातील मनरेगा कामांची पाहणी करणार आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर दौऱ्याचा समारोप होणार आहे. दौरा निश्चित झालेल्या गावांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.