शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नवे प्रवेशद्वार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:28 PM

मूल तालुक्यातील सोमनाथ गावाकडील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक व वनविभागाने यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देपर्यटकांची मागणी : सोमनाथ प्रवेशद्वारातून पर्यटन विकास

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा : मूल तालुक्यातील सोमनाथ गावाकडील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक व वनविभागाने यासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मूल शहरापासून केवळ ९ किमी अंतरावर असलेल्या सोमनाथ परिसराला निसर्गाची देणगी लाभली आहे. वर्षभरातील १० महिने येथे पर्यटकांची मांदियाळी असते. याच परिसरात हेमाडपंथी पुरातन मंदिर असून बाजूला वाहणारा धबधबा आहे. हिरव्याकंच वनराईने पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या परिसरातील डोंगर रांगातून वर्षभर वाहणाऱ्या झºयामुळे पाखरांची किलबिल सुरू असते. या परिसरात वन्यजीवांचे सहजपणे दर्शन होते. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चामोर्शी व गोंडपिपरी या शहरांना जोडणारे मूल शहर हे केंद्रस्थानी आहे. त्यातही दक्षिण-पूर्व मार्गाला जोडणारे मारोडा रेल्वेस्थानक केवळ पाच किमी अंतरावर आहे. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी उभारलेल्या सोमनाथ प्रकल्पाला देशभरात प्रसिद्धी मिळाली. देश-विदेशातून अभ्यासक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतात. सोमनाथ येथून डोणी गावाकडे जाण्यासाठी अनेक वर्षांपासून पाऊलवाटेचा उपयोग केला जातो. या परिसरातील नागरिक याच मार्गाने जंगलात जातात. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून डोनी गावाकडे जाण्याचा हा महत्त्वाचा व सुरक्षित मार्ग होता. एकदा ही टेकडी चढली की व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सोमनाथ प्रकल्पाकडे जाताना दोन किमी अंतराच्या परिघातच वाघ अथवा अन्य वन्यजीवांचे दर्शन सहजपणे घेता येते.काही वर्षांपूर्वी सोमनाथ येथे रिसोर्ट बांधण्यात आले. शिवाय, रस्ते बांधकामही पूर्ण झाले आहेत. पाण्याची टंचाई नाही. हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. वर्षेभर हजारो भाविक सोमनाथ येथे येतात. पर्यटकांची वर्दळ सुरू असूनही ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी प्रवेशद्वार सुरू करण्यात आले नाही. ताडोबा संरक्षित जंगलात व्याघ्र दर्शनासाठी या मार्गातून प्रवेश दिल्यास निसर्गरम्य सोमनाथ, सोमनाथ सेवा प्रकल्प आणि व्याघ्रदर्शन असा तिहेरी फायदा पर्यटकांना होऊ शकतो. शिवाय बफर झोन क्षेत्रातील युवक व युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. वन हा वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची चळवळ गतिमान होवून महसूल मिळू शकतो. त्यामुळे सोमनाथकडून प्रवेशद्वार सुरू करावा, अशी मागणी पर्यटकांनी मागणी आहे.स्वयंरोजगाराच्या संधी वाढतीलताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे देशभरातील पर्यटक जिल्ह्यात येतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात सोमनाथ हे स्थळदेखील आकर्षक आहे. व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी सोमनाथकडील प्रवेशद्वार सुरू केल्यास पर्यटकांची संख्या पुन्हा वाढेल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वार्षिक उत्पन्नात भर पडून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, वन विभागाने यासंदर्भात अजूनही सकारात्मक विचार केला नाही. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.