शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

By admin | Updated: February 4, 2017 00:36 IST

राजुरा तालुक्यातील धोपाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील शेकडो शेतकरी उपोषणाला बसले असून ...

मागण्यांची पूर्तता करा : प्रशासन व वेकोलि व्यवस्थापनाचे दुर्लक्षराजुरा : राजुरा तालुक्यातील धोपाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील शेकडो शेतकरी उपोषणाला बसले असून २४ तास उलटूनही वेकोलि आणि प्रशासनाचे एकही अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळाला भेट दिली नाही. वेकोलिने इतर ३७२ हेक्टर जमीन अधिगृहीत करुन घेतली. परंतु वेकोलि आणि केंद्र शासनाच्या निष्क्रीय धोरणामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.राजुरा येथे विलास घटे, बाळू जुलमे, राजु मोहारे, बालाजी पिंपळकर, रवींद्र बोबडे, सोनु गाडगे असे सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून या भागातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी त्यांच्या समर्थनार्थ पेंडालमध्ये बसले आहे. वेकोलि प्रशासन खदान सुरु करण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. शेतीवर लागणाऱ्या सेक्शनमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्याचबरोबर वेकोलिच्या प्रचंड प्रदूषणाने शेतीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. सदर प्रक्रिया गेली पाच वर्षापासून वेकोलिने सुरु केली आहे. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणार या आशेने दुसरीकडे कुठेही गुंतवणूक न करता वेकोलीने दिलेल्या आश्वासने बळी पडले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मुला-मुलीचे शिक्षण, मुलीचे लग्न, घरातील आर्थिक परिस्थती, आरोग्याच्या समस्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी नरकयातना भोगत आहे. कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांवर करो या मरो ची अवस्था झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणात वेकोलिच्या बड्या अधिकाऱ्यांशी वारंवार निवेदन देवून विचारपूस केली असता येथील अधिकारी आणि वरील अधिकाऱ्यांनी सांगीतलेल्या माहितीत तफावत आहे. या अगोदर समस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ८०० ते ९०० च्या संख्येने भवानी माता मंदिर ते तहसील कार्यालयपर्यंत मुक मोर्चा काढून निवेदने दिली. लवकरात लवकर शेती अधिग्रहीत करुन नोकरी आणि शेतीचा मोबदला द्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करु. आमच्या १०८० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांपैकी जगदीश गजानन मोहारे यांनी शेतात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करुन आपले जीवन संपविले. इतर शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती येऊ नये, याची वेकोलि व शासनाने काळजी घ्यावी व ३१ मार्च २०१७ च्या आत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)राजकीय नेत्याची भेटप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळाला राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे यांनी भेट दिली.आंदोलन तीव्र करण्याचा इशाराप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा इशारा विजय चन्ने, बाळू जुलमे, विलास घटे, बालाजी कुबडे, राजु मोहारे, मनिषा पायघन, शालू पिंपळकर, मनिषा बोबडे, अर्चना मोहारे, विजया कुबडे यांच्यासह विविध गावातील प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.