शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:28 AM

नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देअल्प उत्पादनाचा फटका : यंदाही कर्ज जैसे-थे राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला होता. कापूस उत्पादक शेतकºयांनी गतवर्षाचा अंदाज घेऊन सोयाबीनला लागवडीला प्राधान्य दिले. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत बियाण्याच्ांी खरेदी केली. पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी पाऊस आला. त्यामुळे सोयाबीन पीक समाधानकारकरीत्या उगविले होते. मात्र, सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या स्थित असताना पावसाने दगा दिला. याचा जोरदार फटका जिल्ह्यातील पिकांना बसला आहे. राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबिनची मळणी केली. यामध्ये एकरी उत्पन्नात मोठी घट आली. शासनाने सोयाबिनला हमीभाव दिल्याने शेतकरी आशावादी झाला होता. व्यापाऱ्यांच्या दारात न जाता आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हमी भावाने सोयाबिन विकण्याचे स्वप्न पाहत होते. पण यंदाच्या अल्प उत्पादनाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँका आणि विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतीसाठी कर्ज घेतले होते. उत्पादन न झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांचा अपेक्षाभंगमागील तीन वर्षांपासून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकºयांचे अर्थकारण बिघडले. खर्चाच्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने रब्बी व खरिप हंगामाचे नियोजन करण्यासाठी अडचणी पुढे येत आहेत. काळानुसार शेती करतो म्हटले तर निसर्ग साथ देत नाही. भरघोस उत्पन्न मिळाल्यास सुलतानी संकट उभे राहते. हा प्रकार यंदाही शेतकºयांबाबत घडत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती