शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:29 IST

नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देअल्प उत्पादनाचा फटका : यंदाही कर्ज जैसे-थे राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला होता. कापूस उत्पादक शेतकºयांनी गतवर्षाचा अंदाज घेऊन सोयाबीनला लागवडीला प्राधान्य दिले. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत बियाण्याच्ांी खरेदी केली. पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी पाऊस आला. त्यामुळे सोयाबीन पीक समाधानकारकरीत्या उगविले होते. मात्र, सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या स्थित असताना पावसाने दगा दिला. याचा जोरदार फटका जिल्ह्यातील पिकांना बसला आहे. राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबिनची मळणी केली. यामध्ये एकरी उत्पन्नात मोठी घट आली. शासनाने सोयाबिनला हमीभाव दिल्याने शेतकरी आशावादी झाला होता. व्यापाऱ्यांच्या दारात न जाता आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हमी भावाने सोयाबिन विकण्याचे स्वप्न पाहत होते. पण यंदाच्या अल्प उत्पादनाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँका आणि विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतीसाठी कर्ज घेतले होते. उत्पादन न झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांचा अपेक्षाभंगमागील तीन वर्षांपासून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकºयांचे अर्थकारण बिघडले. खर्चाच्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने रब्बी व खरिप हंगामाचे नियोजन करण्यासाठी अडचणी पुढे येत आहेत. काळानुसार शेती करतो म्हटले तर निसर्ग साथ देत नाही. भरघोस उत्पन्न मिळाल्यास सुलतानी संकट उभे राहते. हा प्रकार यंदाही शेतकºयांबाबत घडत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती