शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
5
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
6
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी ती म्हणाली 'हो',तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
7
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
8
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
9
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
10
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
11
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
12
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
13
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
14
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
15
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
16
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
17
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
18
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
19
रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी
20
भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST

वरोरा (चंद्रपूर) : मागील काही वर्षांपासून चिमूर-वरोरा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामात चुकीच्या नियोजनामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी ...

वरोरा (चंद्रपूर) : मागील काही वर्षांपासून चिमूर-वरोरा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामात चुकीच्या नियोजनामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले असून सोयाबीन पीक पूर्णतः बुडाले आहे. सोयाबीनला शेंगा लागल्या असून सोयाबीन पाण्याखाली असल्याने त्याची प्रतवारी खराब होऊन शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वरोरा तालुक्यातील चारगाव बु. येथील शेतकरी मधुकर निलेकर, नितेश वटे, अरविंद वायकुळे, तिरुपती हिवरे, या शेतकऱ्यांनी तीन ते चार एकरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली तर विठोबा कुमरे या शेतकऱ्याने धानाची लागवड केली आहे. सध्या सोयाबीनला शेंगा लागल्या असून शेंगा परिपक्व झाल्या आहेत. येत्या काही दिवसात सोयाबीन पीक हातात येण्याची आशा शेतकरी बाळगून असताना चिमूर-वरोरा मार्गाचे काम सुरू आहे. चुकीच्या नियोजनाने या सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली बुडाली आहे. पिकावर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सोयाबीन पीक पाण्यात पडल्याने शेंगांना अंकुर फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन होईल, परंतु अंकुर फुटल्याने सोयाबीनला अपेक्षित दर मिळणार नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

कोट

रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळे पिके पाण्याखाली आली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी.

-राजेंद्र चिकटे, उपाध्यक्ष जिल्हा सरपंच संघटना.

220921\img-20210921-wa0095.jpg

warora