शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सून बरसला मात्र गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा पाऊसच पडला नाही, हे आतापर्यंत नोंदविलेल्या ९३.८० मि. मी. पावसातून स्पष्ट झाले. पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे. 

१,४२६ हेक्टर क्षेत्रात पऱ्हे भरलेधानाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ८४ हजार २९० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ एक हजार ४२६ हेक्टरवर धानाच्या पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.८३ टक्के आहे. सोयाबीनचे प्रत्यक्ष क्षेत्र ६५ हजार ६२ इतके आहे. पाऊस न झाल्याने सोयाबीनची लागवड झालेली नाही.

जिल्ह्यात ९३.८० मिमी पाऊस बरसला- मूल, सावली, सिंदवाही, ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यांत भातशेती केली घेतले. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. १ ते २३ जूनपर्यंतच पावसाने हजेरी लावली. त्याची सरासरी ९३.८० मिमी आहे. २३ दिवसात केवळ ५१.१२ टक्के पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

कापूस लागवडीवरही अनिष्ट परिणामकापसाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ७७ हजार ३८५ हेक्टर आहे. त्यापैकी एक हजार ७४३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. केवळ चंद्रपूर आणि राजुरा तालुक्यांत कापसाची लागवड केली आहे. अन्य तालुक्यांमधील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी   चंद्रपूर जिल्ह्यात गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी पाऊस बरसला होता. मात्र, यंदा केवळ ९३.८० मिमी  पडल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती