शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सून बरसला मात्र गतवर्षीच्या तुलनेत पुरेसा पाऊसच पडला नाही, हे आतापर्यंत नोंदविलेल्या ९३.८० मि. मी. पावसातून स्पष्ट झाले. पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तीन हजार १६९ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.७१ टक्के इतकी आहे. 

१,४२६ हेक्टर क्षेत्रात पऱ्हे भरलेधानाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ८४ हजार २९० हेक्टर आहे. त्यापैकी केवळ एक हजार ४२६ हेक्टरवर धानाच्या पेरण्या झाल्या. त्याची टक्केवारी ०.८३ टक्के आहे. सोयाबीनचे प्रत्यक्ष क्षेत्र ६५ हजार ६२ इतके आहे. पाऊस न झाल्याने सोयाबीनची लागवड झालेली नाही.

जिल्ह्यात ९३.८० मिमी पाऊस बरसला- मूल, सावली, सिंदवाही, ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यांत भातशेती केली घेतले. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. १ ते २३ जूनपर्यंतच पावसाने हजेरी लावली. त्याची सरासरी ९३.८० मिमी आहे. २३ दिवसात केवळ ५१.१२ टक्के पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

कापूस लागवडीवरही अनिष्ट परिणामकापसाचे प्रत्यक्ष क्षेत्र एक लाख ७७ हजार ३८५ हेक्टर आहे. त्यापैकी एक हजार ७४३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. केवळ चंद्रपूर आणि राजुरा तालुक्यांत कापसाची लागवड केली आहे. अन्य तालुक्यांमधील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी   चंद्रपूर जिल्ह्यात गतवर्षी २३ जूनपर्यंत १५६ मिमी पाऊस बरसला होता. मात्र, यंदा केवळ ९३.८० मिमी  पडल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती