शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यप्राण्यांसाठी ठरले वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:11 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासत असते. वन्यप्राण्यांसाठी पुरेसे पाणवठे असले तरी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यजीवांना संजीवनी देणारे ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची आवश्यकता भासत असते. वन्यप्राण्यांसाठी पुरेसे पाणवठे असले तरी नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वन्यजीवांना संजीवनी देणारे ठरले आहे.महाराष्ट्र शासनाने बफर व कोअर अशी विभागणी करून ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पात सहा परिक्षेत्रांची निर्मिती केली. यात मूल परिक्षेत्रात ९६.७० चौ.कि.मी. क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र असल्याने वन्यप्राण्यांचा वावरही लक्षवेधी असल्याचे या परिक्षेत्रात दिसून येते. पावसाळा व हिवाळा या दोन ऋतुंमध्ये वन्यप्राण्यांना पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जलस्त्रोत उपयुक्त ठरत आहेत. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोल गेल्यास जंगलाजवळील काही भागात पाणी मिळणे दुरापास्त होते़ पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू असते. वनविभागाने काही ठिकाणी सौरपंप बसवून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची आवश्यकता भासते़सोमनाथ, भादुर्णी परिसरात तलाव असून त्यातील पाण्याचा आता उपयोग होत आहे. पडझरी, शिवापूर चक या परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असल्याने समस्या सुटली. डोंगरदऱ्यातून बरेच पाणी झिरपते. त्यातून वन्यप्राण्यांना तृषा भागविता येते. या परिक्षेत्रातील बारमाही वाहणाऱ्या झऱ्यांमुळे वन्यप्राण्यांची अडचण दूर झाली आहे.झऱ्यामुळे टळले जलसंकटउन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कमी होतात. पण, मूल वन क्षेत्रातील झऱ्यातून पाणी सतत वाहत असल्यामुळे वन्य प्राण्यांना तृष्णा भागविणे शक्य झाले़ वन्यप्राण्यांची भटकंती थांबली. यासाठी नैसर्गिक जल स्त्रोत महत्त्वाचे ठरले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर झोनमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत मुबलक प्रमाणात असल्याने वन्य प्राण्यांसाठी वरदानच ठरत असल्याचे दिसून येत आहे़

टॅग्स :Waterपाणी