शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

निकाल लागला, पालकांसह विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी धावपळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

सध्या कोरोना  संकट आहे. त्यामुळे नियम पाळून विद्यार्थ्यांना  विविध शासकीय कार्यालयातून कागदपत्र काढावी लागणार आहे. शासकीय कागदपत्र काढताना कोणती काळजी घ्यायची तसेच यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागते यासंदर्भात विद्यार्थ्यांनी खचून न जाते पुढीलप्रमाणे कागदपत्र गोळा करावे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी कागदपत्र गोळा  करताना चांगलीच दमछाक होत आहे. सध्या कोरोना  संकट आहे. त्यामुळे नियम पाळून विद्यार्थ्यांना  विविध शासकीय कार्यालयातून कागदपत्र काढावी लागणार आहे. शासकीय कागदपत्र काढताना कोणती काळजी घ्यायची तसेच यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागते यासंदर्भात विद्यार्थ्यांनी खचून न जाते पुढीलप्रमाणे कागदपत्र गोळा करावे.

नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट (उच्च उत्पन्न गटात नसल्याबाबतचा दाखला)- आवश्यक कागदपत्रे- जातीचा दाखला- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र- आठ लाखांच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला- शाळा सोडल्याचा दाखला- या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.

असे मिळवा विविध दाखले जातीचा दाखला- कुटुंबातील व्यक्तीचा सन १९६७ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.- सन १९६७ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६७ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक-  रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.- विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती

(एसबीसी, व्हीजेएनटी)- कुटुंबातील ज्याचा सन १९६१ पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.- सन १९६१ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६१ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतकडून मिळणारे घरठाण पत्र (असेसमेंट उतारा)- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.

या दाखल्यासाठी प्रतिज्ञापत्रजातीचा दाखला आणि नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट), तर उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाईलसाठी स्व:घोषणापत्र (सेल्फ डिक्लरेशन) द्यावे लागते. त्याबाबतची प्रक्रिया महा ई-सेवा केंद्रात होते.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (एस.सी., एस.टी.) -  कुटुंबातील ज्याचा सन १९५० पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावा. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.- सन १९५० पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९५० पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी  आवश्यक कागदपत्रे- उत्पन्नाचा तलाठ्यांंचा दाखला, शहरातील असल्यास तलाठी कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला- नोकरी असल्यास (आयकर विवरणपत्र)- शेती असल्यास (सातबारा)-  रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र- या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी शासनाने १५ दिवसांची मुदत दिली आहे.

डोमिसाईल- (वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला)- मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक- शाळा सोडल्याचा दाखला- १५ वर्षांचा रहिवास सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (वीज बिल, असेसमेंट उतारा, सातबारा, आदी)- रेशनकार्ड, आधारकार्ड आणि एक छायाचित्र.- या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्राकडे अर्ज करावा. संबंधित दाखला मिळण्याची मुदत १५ दिवस आहे.

अर्ज करण्याची अशी आहे प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयातील महा ई-सेवा केंद्रात अर्ज जमा करावा.  जातीच्या दाखल्यासाठी १९६७, १९६१ आणि १९५० ही वर्ष मानीव दिनांक पुरावा ग्राह्य धरले आहेत. या दिनांकांपूर्वी जो रहिवास पुरावा असेल. त्या (उदा. सातबारा अथवा घरठाण पत्रक जर, दुसऱ्या तालुक्यातील असेल आणि सध्या अर्जदार हा चंद्रपुरात राहत असेल, तर अर्जदाराला सातबारा अथवा घरठाण पत्रक असलेल्या तालुक्यात अर्ज करावा लागतो.)  ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संंबंधित नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत कार्यालयातील कार्यवाही पूर्ण केल्या जाते. त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन डिजिटल  स्वाक्षरी झाल्यानंतर महा ई-सेवा केंद्रातून जातीचा अर्जदाराला दाखला मिळतो. पालकांनी प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्र जावून दाखला काढावा, दलालांपासून सावध  राहून आपले नुकसान टाळावे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा