शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

जिल्हा अनलॉक होताच व्यावसायिकांचे मास्क निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

प्रशासनाने दिलेले सर्व नियम धाब्यावर भद्रावती : महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमांमध्ये शिथिलता येताच चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा शिथिलता देण्यात ...

प्रशासनाने दिलेले सर्व नियम धाब्यावर

भद्रावती : महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमांमध्ये शिथिलता येताच चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा शिथिलता देण्यात आली. या शिथिलतेमुळे भद्रावती शहरातील प्रतिष्ठानामधील मालक व नोकर वर्गांचे तोंडावरील मास्क निघाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यामुळे पुन्हा कोरोना संसर्गाची शक्यता आहे.

शहरात अनलॉकच्या पहिल्या दिवशी जीवनावश्यक व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना आपली प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी मिळाली. मात्र, प्रशासनाने कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यात नियमित मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन, आस्थापना-दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिता प्रवेश करताना त्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक केले आहे. अनलॉकच्या पहिल्या दिवशी काही पेट्रोल पंपांवर, सब्जी मंडी फळविक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडे प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. सुरक्षित अंतराचा अभाव होता तर काही प्रतिष्ठानांमध्ये सॅनिटायझर किंवा इतर हात धुण्याचे साबण नसल्याचे बघावयास मिळाले. शासनाने कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या असल्या तरी व्यापाऱ्यांकडून या नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या संसर्गामुळे कोरोनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना लाटेला रोखण्यासाठी नगर परिषद आरोग्य विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

===Photopath===

070621\img_20210607_113910.jpg

===Caption===

जिल्हा अनलॉक होताच व्यावसायिकांचे मास्क निघाले.