शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

समाधान आणि नाराजीही

By admin | Updated: July 8, 2014 23:23 IST

रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया : काजीपेठ-मुंबई थेट रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासाचंद्रपूर : रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेली काजीपेठ-मुंबई ही रेल्वे सुरु होणार असल्याने चंद्रपूर- बल्लापूर येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.अपेक्षेनुसार बजेट- सुंचूवारमागील १५ वर्षांपासून मुंबईसाठी रेल्वेची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. या बजेटमध्ये सर्व राज्यांना सामावून घेतले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे मत जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनचे अध्यक्ष तसेच रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी व्यक्त केले.विकासाला गती मिळेलसादर झालेला रेल्वे बजेट विकासाला गती देणारा आहे. हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आल्याने भविष्यात प्रवाशांना सोयीचे होणार आहे. रेल्वे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतिल अशी अपेक्षा आहे. प्लॅटफाम व अनारक्षित टिकीट आता इंटरनेटरवर उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच रेल्वेला होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी एफडीआयचा प्रस्ताव आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी योग्य असल्याचे मत सतीश चहारे यांनी व्यक्त केले.अनेक आश्वासनेरेल्वेमंत्र्यांनी बजेटमध्ये रेल्वेच्या सुविधेसाठी पैसा कुठून येणार याबद्दल आपल्या सांगितले नाही. बजेटमध्ये खासगीकरण तसेच कॉर्पोरेटवर जास्त भर देण्यात आला. यामुळे खासगीकरण झाल्यास रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, काय, असा प्रश्न उपस्थित करून बजेटमधील काही घोषणा स्वागतार्य आहे. एफडीआय व कॉर्पोरेटमुळे चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात अन्य गोष्टींवरही भर देणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याचे मत सुरेश मडावी यांनी व्यक्त केले.चंद्रपूर-गडचिरोलीकडे दुर्लक्षरेल्वे विभागाने सादर केलेल्या बजेटमध्ये चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला स्थान दिले नाही. नागभीड-नागपूरला रेल्वे मार्गाला ब्राडगेजमध्ये करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विदर्भाला पाहिजे तसे झुकते माप देण्यात आले नाही. विदर्भात अनेक शहरात अद्यापही रेल्वे पोहचली नाही. त्यामुळे विदर्भाकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे होते. बजेट विदर्भावर अन्याय करणारा असल्याचे मत राकेश पोतराजे यांनी व्यक्त केले.दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्पस्वच्छता ते आधुनुकीकरण असा रेल्वे अर्थसंकल्प आहे.बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवाश्यांसाठी अच्छे दिन आले आहे.रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगारीवर काही प्रमाणात मात करण्यात येणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसमावेश असून सर्व राज्यांना समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. काही नव्या गाड्याही सुरु करण्यात आल्याचे मत राजू शामडुले यांनी व्यक्त केले.