शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाधान आणि नाराजीही

By admin | Updated: July 8, 2014 23:23 IST

रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया : काजीपेठ-मुंबई थेट रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासाचंद्रपूर : रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेली काजीपेठ-मुंबई ही रेल्वे सुरु होणार असल्याने चंद्रपूर- बल्लापूर येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.अपेक्षेनुसार बजेट- सुंचूवारमागील १५ वर्षांपासून मुंबईसाठी रेल्वेची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. या बजेटमध्ये सर्व राज्यांना सामावून घेतले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे मत जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनचे अध्यक्ष तसेच रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी व्यक्त केले.विकासाला गती मिळेलसादर झालेला रेल्वे बजेट विकासाला गती देणारा आहे. हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आल्याने भविष्यात प्रवाशांना सोयीचे होणार आहे. रेल्वे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतिल अशी अपेक्षा आहे. प्लॅटफाम व अनारक्षित टिकीट आता इंटरनेटरवर उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच रेल्वेला होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी एफडीआयचा प्रस्ताव आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी योग्य असल्याचे मत सतीश चहारे यांनी व्यक्त केले.अनेक आश्वासनेरेल्वेमंत्र्यांनी बजेटमध्ये रेल्वेच्या सुविधेसाठी पैसा कुठून येणार याबद्दल आपल्या सांगितले नाही. बजेटमध्ये खासगीकरण तसेच कॉर्पोरेटवर जास्त भर देण्यात आला. यामुळे खासगीकरण झाल्यास रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, काय, असा प्रश्न उपस्थित करून बजेटमधील काही घोषणा स्वागतार्य आहे. एफडीआय व कॉर्पोरेटमुळे चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात अन्य गोष्टींवरही भर देणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याचे मत सुरेश मडावी यांनी व्यक्त केले.चंद्रपूर-गडचिरोलीकडे दुर्लक्षरेल्वे विभागाने सादर केलेल्या बजेटमध्ये चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला स्थान दिले नाही. नागभीड-नागपूरला रेल्वे मार्गाला ब्राडगेजमध्ये करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विदर्भाला पाहिजे तसे झुकते माप देण्यात आले नाही. विदर्भात अनेक शहरात अद्यापही रेल्वे पोहचली नाही. त्यामुळे विदर्भाकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे होते. बजेट विदर्भावर अन्याय करणारा असल्याचे मत राकेश पोतराजे यांनी व्यक्त केले.दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्पस्वच्छता ते आधुनुकीकरण असा रेल्वे अर्थसंकल्प आहे.बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवाश्यांसाठी अच्छे दिन आले आहे.रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगारीवर काही प्रमाणात मात करण्यात येणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसमावेश असून सर्व राज्यांना समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. काही नव्या गाड्याही सुरु करण्यात आल्याचे मत राजू शामडुले यांनी व्यक्त केले.