शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

समाधान आणि नाराजीही

By admin | Updated: July 8, 2014 23:23 IST

रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया : काजीपेठ-मुंबई थेट रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासाचंद्रपूर : रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेली काजीपेठ-मुंबई ही रेल्वे सुरु होणार असल्याने चंद्रपूर- बल्लापूर येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.अपेक्षेनुसार बजेट- सुंचूवारमागील १५ वर्षांपासून मुंबईसाठी रेल्वेची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. या बजेटमध्ये सर्व राज्यांना सामावून घेतले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे मत जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनचे अध्यक्ष तसेच रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी व्यक्त केले.विकासाला गती मिळेलसादर झालेला रेल्वे बजेट विकासाला गती देणारा आहे. हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आल्याने भविष्यात प्रवाशांना सोयीचे होणार आहे. रेल्वे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतिल अशी अपेक्षा आहे. प्लॅटफाम व अनारक्षित टिकीट आता इंटरनेटरवर उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच रेल्वेला होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी एफडीआयचा प्रस्ताव आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी योग्य असल्याचे मत सतीश चहारे यांनी व्यक्त केले.अनेक आश्वासनेरेल्वेमंत्र्यांनी बजेटमध्ये रेल्वेच्या सुविधेसाठी पैसा कुठून येणार याबद्दल आपल्या सांगितले नाही. बजेटमध्ये खासगीकरण तसेच कॉर्पोरेटवर जास्त भर देण्यात आला. यामुळे खासगीकरण झाल्यास रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, काय, असा प्रश्न उपस्थित करून बजेटमधील काही घोषणा स्वागतार्य आहे. एफडीआय व कॉर्पोरेटमुळे चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात अन्य गोष्टींवरही भर देणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याचे मत सुरेश मडावी यांनी व्यक्त केले.चंद्रपूर-गडचिरोलीकडे दुर्लक्षरेल्वे विभागाने सादर केलेल्या बजेटमध्ये चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला स्थान दिले नाही. नागभीड-नागपूरला रेल्वे मार्गाला ब्राडगेजमध्ये करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विदर्भाला पाहिजे तसे झुकते माप देण्यात आले नाही. विदर्भात अनेक शहरात अद्यापही रेल्वे पोहचली नाही. त्यामुळे विदर्भाकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे होते. बजेट विदर्भावर अन्याय करणारा असल्याचे मत राकेश पोतराजे यांनी व्यक्त केले.दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्पस्वच्छता ते आधुनुकीकरण असा रेल्वे अर्थसंकल्प आहे.बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवाश्यांसाठी अच्छे दिन आले आहे.रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगारीवर काही प्रमाणात मात करण्यात येणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसमावेश असून सर्व राज्यांना समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. काही नव्या गाड्याही सुरु करण्यात आल्याचे मत राजू शामडुले यांनी व्यक्त केले.