शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

सौर ऊर्जेवर पेटल्या चुली

By admin | Updated: May 2, 2015 01:18 IST

एका दिवसात दोन्ही वेळ मिळून ३६०० व्यक्तींचा स्वयंपाक तयार करावा लागतो.

वरोरा : एका दिवसात दोन्ही वेळ मिळून ३६०० व्यक्तींचा स्वयंपाक तयार करावा लागतो. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्चही मोठ्या प्रमाणात व प्रदूषण ही समस्या. ही कटकट कायमची संपविण्यासाठी सौर उर्जेचा प्रकल्प उभारून सौर उर्जेवर ३ हजार ६०० व्यक्तींचा स्वयंपाक करण्यात येत आहे. आनंदवनात सदर प्रकल्प उभारण्यात आला असून विदर्भातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे मानले जात आहे.कर्मयोगी बाबानी आनंदवनाची स्थापना केली. आनंदवनात कुष्ठरोगी बांधवासोबतच अंध, अपंग, वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहत आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था वेगवेगळी केली जाते, परंतु जेवन तयार कण्याचे काम एकत्रीत केले जात आहे. याकरिता भव्य हॉल उभारण्यात आला आहे. या हॉलमध्ये १८०० व्यक्ती एकत्र बसून जेवन करण्याची व्यवस्था करण्यात आली. पिण्याचे पाणी व स्वयंपाक गृहही तयार करण्यात आले. लाकूड जाळण्याला कर्मयोगी बाबांनी सुरुवातीपासूनच प्रखर विरोध केला. त्यामुळे आजही आनंदवनात वृक्षतोड व लाकूड जाळले जात नसल्याने निसर्गाचा समतोल कायम आहे. आनंदवनात जेवन तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येतो. परंतु गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करण्याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने काही दिवसांपूर्वी एक बायोगॅस प्रकल्प आनंदवनात कार्यान्वित करण्यात आला. बायोगॅस प्रकल्पातून येणाऱ्या गॅसवर मागील काही महिन्यापासून स्वयंपाक तयार सुरू असताना एखाद्या वेळी या प्रकल्पात बिघाड निर्माण होऊन स्वयंपाक तयार करताना अडचणी येऊ नये म्हणून एक सौर ऊर्जेचा प्रकल्प आनंदवनात नुकताच तयार करण्यात आला आहे. जमिनीपासून ७० फुट उंचीवर हा प्रकल्प उभारला आहे. याला सौर उर्जेच्या प्लेटस् लावल्या आहेत. या प्लेटस् सूर्य ज्याप्रकारे फिरतो त्याप्रकारे त्या प्लेटस् दिवसभर फिरून उर्जा निर्मिती करते. तयार झालेली उर्जा नजीकच्या बॉयरलमध्ये एकत्रीत केल्या जाते. या बायलरमधून तयार झालेली वीज स्वयंपाकासाठी वापरली जाते. याकरिता स्वयंपाकाची भांडी व शेगड्या तयार करण्यात आल्या आहेत. सौर उर्जेच्या प्रकल्पानजीक हवादर्शक यंत्रही उभारण्यात आले आहे. बायलरमध्ये विशिष्ठ प्रकारे साठविलेली वीज दुसऱ्या दिवशीही स्वयंपाकासाठी वापरण्यात येत असल्याने सूर्यनारायणाचे दर्शन एखाद्या दिवशी झाले नाही तरी स्वयंपाकाची अडचण येणार नसल्याची माहिती, सौर उर्जेचे आॅपरेटर दिलीप रॉय यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)