शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातून होताहे मातीचे सर्रास खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे. मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला.

ठळक मुद्देउमा नदीचे नैसर्गिक पात्र संपुष्टात : महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. सदर कामासाठी रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, डोंगरगांव ते रत्नापूर या रस्त्याचे तसेच उमा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. याच पुलाजवळ माती तस्करांनी मोठमोठे खड्डे करून तस्करी सुरु केली आहे. यामध्ये शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्रातील खड्ड्यांमुळे भविष्यात अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे.मूल तालुक्यातील डोंगरगांव आणि रत्नापूर येथील नागरिकांच्या मागणीवरून मागील सरकारने डोंगरगांव ते भादुर्णा रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाच्या कामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. या कामाला सुरुवात झाली असून नदीवरील पुलाचे पिल्लरसुद्धा उभे झाले आहे.मात्र सदर कामाच्या बाजुने नदीपात्रातून पोकलॅन्डव्दारे मोठ्या प्रमाणात मातीचे खनन केले जात आहे. त्यामुळे पात्रामध्ये ७ ते ८ फुट खोल खड्डे पडले असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे खनन प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हामहासचिव राकेश रत्नावर यांनी प्रशासनाकडे केली आहे.अपघात झाल्यास जबाबदार कोणमौजा डोंगरगांव येथील नदीघाटावरून मातीचे खनन केल्या जात असल्यामुळे काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. पावसाळ्यात सदर खड्डे पाण्याने भरतील त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण जाणार आहे. परिणामी एखाद्यावेळी अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. त्याच्या काही अंतरावरच स्मशानभुमी आहे. येथे मोठ्या संख्यने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेकडो ब्रास मातीची चोरीपोकलॅन्डच्या माध्यमातुन नदीतून मातीचे खनन केले जात आहे. हायवाद्वारे ही माती इतरत्र नेली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या खड्ड्यांमुळे नदीपात्रात खड्डेच खड्डे दिसत आहे.डोंगरगांव-रत्नापूर मार्गावरील नदीपात्रातील मातीच्या खननाबाबत पथकाद्वारे चौकशी केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास खनन करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.- डी. जी. जाधव, तहसीलदार, मूल

टॅग्स :riverनदी