शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

सोशल डिस्टंन्सिंगचे वाजताहेत तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्यांना तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोरीछुपे येणाºयांचे प्रमाण अद्यापह कमी झालेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता कडक उपाय योजनास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरीतील भाजी मंडईत प्रचंड गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाही अनेकांना याच गांर्भीय नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. लॉकडाऊ न असतानाही दुचाकीवरून पोलिसांचा नजर चुकवत अनेकजण दररोज खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. भाजी विक्रीची ठिकाणे, मासेविक्रीची ठिकाणे व किराणा दुकानांमध्येही शहरात आणि गावांमध्येही गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या केलेल्या अवाहनाचे तीनतेरा वाजताना दिसत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्यांना तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोरीछुपे येणाऱ्यांचे प्रमाण अद्यापह कमी झालेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता कडक उपाय योजनास सुरूवात केली आहे. तरीही नागरिकांकडून या उपाययोजनांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्वजण हतबल झाले आहेत.शहरातील बाजारात काही मच्छीविक्रेते, मासे विक्रीसाठी आनण्यात आले होते. बाजारात मासे खरेदीसाठी ग्राहकांची रिघ लागली. यावेळी सोशल डिस्टन्स राखले गेलेले नाही. हे उघडपणे दिसून येत होते. त्याचबरोबर कोरोनाचे संकट गंभीर वळणार असतानाही अनेकांनी मास्क किंवा साधे रूमालही तोंडाला बांधलेले नसल्याचे दिसून आले.मागील दोन ते तीन दिवसांपासून बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे. किराणामाल खरेदीसाठी व अन्य अवश्यक वस्तूसाठी बाजारपेठेत जात असल्याचे सांगण्यात येत आहे.ुब्रह्मपुरीतील भाजी मंडईत प्रचंड गर्दीब्रह्मपुरी : रविवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भाजी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. तर ग्राहकांनीसुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघन करीत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते जीवापाड प्रयत्न करीत आहेत. परंतु, नागरिकांना यांचे गांभीर्य दिसून येत नसून ते बाजारपेठेमध्ये गर्दी करीत आहेत. भाजीविक्रेते दररोज घरी भाजीविक्री करण्यासाठी येत असताना अनेकजण बाहेर पडून खरेदी करीत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लघन होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक