शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेशाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:30 IST

चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा असायची. आता मात्र ते दिवस बदलले असून आयटीआयलाच विद्यार्थी शोधण्याची वेळ ...

चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा असायची. आता मात्र ते दिवस बदलले असून आयटीआयलाच विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. त्यातच मागीलवर्षी कोरोना संकटामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षीही अशीच अवस्था आहे. आयटीआय करूनही नोकरीची हमी नसल्यामुळे इतर अभ्यासक्रमांसारखीच आयटीआयचीही अवस्था होत असल्याचे बघायला मिळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ५२ शासकीय तसेच खासगी आयटीआय आहेत. यामध्ये १८ शासकीय तसेच ३४ खासगी आयटीआयचा समावेश आहे. यामध्ये ३ हजार ५४४ शासकीय, तर २ हजार ७३४ खासगी आयटीआयमध्ये जागा उपलब्ध आहेत.

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे आयटीआय केल्यास रोजगार मिळेल, अशी विद्यार्थ्यांना आशा आहे. मात्र विद्यार्थी अधिक आणि रोजगार कमी, अशी अवस्था बनल्याने आयटीआय करूनही बेरोजगार राहण्याची वेळ अनेकांवर येत आहे. विशेष म्हणजे, खासगीच्या तुलनेमध्ये शासकीय आयटीआयमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षक, शिक्षक, प्रात्यक्षिक आदींद्वारे विद्यार्थ्यांना शिकविले जाते. असे असले तरी विद्यार्थी आता अन्य अभ्यासक्रमांकडे वळत असल्याचे विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांवरून दिसून येत आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात आयटीआय - ५२

शासकीय १८

खासगी - ३४

--

प्रवेश क्षमता

शासकीय जागा ३५४४

खासगी जागा २७२४

--

अर्ज स्थिती...

एकूण जागा ६२६८

आलेले अर्ज ६४३०

बाॅक्स

गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद

मागील वर्षीपासून कोरोना संकट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेणे टाळले आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अधिक अर्ज आले आहेत. मात्र आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये घटत आहे.

बाॅक्स

...म्हणून घटत आहेत विद्यार्थी

दहावी, बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी आयटीआयकडे वळतात. काही वर्षांपूर्वी आयटीआय केल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होत होत्या. यामध्ये मोठी स्पर्धा नव्हती. आता मात्र आयटीआय करूनही जागाच निघत नसल्याने, शिकून उपयोग काय, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, आयटीआय करून स्वरोजगार उभा करता येतो. मात्र भांडवलासाठीही विविध कागदपत्रे तसेच येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमाकड़े आता दुर्लक्ष करीत आहेत.

बाॅक्स

विद्यार्थी म्हणतात...

कोट

पूर्वी आयटीआयचे शिक्षण घेतल्याबरोबर नोकरीच्या संधी प्राप्त होत होत्या. त्यामुळे आयटीआयला विशेष महत्त्व होते. आता दिवस बदलले. आयटीआय करूनही नोकरीची कुठेच संधी नाही. त्यामुळे या शिक्षणाकडे वळण्यापेक्षा इतर शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल आहे.

- मंगल डाखोरे, चंद्रपूर

कोट

आयटीआय करून कुठेतरी नोकरी मिळेल, ही आशा पूर्वी असायची. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे केवळ आशेवर आहेत. विशेषत: वेकोलिमध्ये जमीन गेलेले बहुतांश विद्यार्थीच आयटीआय करीत आहेत. त्यांना वेकोलि नोकरी देईल, ही हमी आहे. उर्वरित बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी आयटीआय करीत आहेत.

- रोहन मुसले, चंद्रपूर