शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

‘तो’ आजही चालतो अनवानी पायाने !

By admin | Updated: May 7, 2015 01:03 IST

आजचे युग हे आधुनिक युग आहे. गावखेडे, शहरात झपाट्याने परिवर्तन होत आहे.

शरद देवाडे कान्पाआजचे युग हे आधुनिक युग आहे. गावखेडे, शहरात झपाट्याने परिवर्तन होत आहे. काळाचा ओघ पाहून मानवी आयुष्यातही बदल घडत आहे. परंतु या आधुनिक काळातही तो बदललेला नाही. येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील ढोरपा येथील विश्वेश्वर लक्ष्मण विधाते (३४) हा युवक अगदी लहानपणापासून अनवानी पायानेच चालत आहे.महागडे जोडे किंवा चप्पल घालायला कधी मिळेल, या आशेत अनेकजण असतात. मात्र एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या विश्वेश्वर विधाते या युवकाने प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पायात अजूनही चप्पल व जोडे घातलेले नाही. त्याच्या या उपक्रमाने परिसरातील व गावातील लोक त्याच्याकडे कुतूहलाने पाहत असतात. कॉलेजच्या जीवनात मात्र त्याला विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या थट्टेला सामोरे जावे लागले. तेवढे असूनही त्याने जगाची पर्वा न करता आपले एम.ए. पर्यंत शिक्षण ब्रह्मपुरीला पुर्ण केले. आज तो ग्रामपंचायत सदस्य आहे. मात्र अजूनही त्याने पायात साधी चप्पलही घातलेली नाही. शेतीवर अथवा कोणत्याही कामासाठी भर उन्हातही तो अनवानी पायाने रस्त्यावरुन ये- जा करीत असतो. एरव्ही लहानपणापासूनच आई- वडिलांकडे चप्पल किंवा जोडे यांचा हट्ट करणारी मुले सर्वत्र दिसून येतात. मात्र विश्वेश्वरला या पादत्राण्याचा मोह कधीच पडला नाही. त्याच्या या अनवानी चालण्यामुळे त्याला स्वत:चे लग्न जोडण्यास त्रास गेला. एकदातर जुळलेले लग्न तुटण्याच्याही मार्गावर होते. चप्पल घालत नाही. त्यामुळे तो वेडा तर नाही ना असा समज मुलीमध्ये निर्माण झाला होता. परंतु एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेला वेडा कसा असू शकतो, हे मध्यस्थीने पटवून दिल्यानंतर त्याचे अखेर लग्न जुळले. मात्र त्याने आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही.चप्पल न घालता चालल्यानंतर पायाचा व डोक्याचा डायरेक्ट संपर्क येतो. त्यामुळे शरिरातील ऋण भार पायाद्वारे जमिनीत मिसळल्यामुळे त्याला अजून कोणताही आजार झाला नाही, असे त्याचे म्हणणे आहे. पायात चप्पल वा जोडे घालत नसल्याने मनाला हलकेपणा वाटतो व दैनंदिन कामात आळस येत नाही, असेही तो सांगतो. त्याला याबाबत कोणी मार्गदर्शन केले, हे सांगणे तो टाळतो. मात्र हा उपक्रम कधीही मोडीत काढत नाही.