शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

रोजगार नसल्याने सहा हजार मजुरांचे हात रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

२३ मार्चपासून बांधकामाशी निगडीत कामे बंद करण्यात आली. २२ एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले. पण, नियमांच्या धास्तीने बांधकाम बंद आहेत. शहरातील मजुरांच्या दृष्टीने येथील बुधवारच्या आठवडी बाजाराचे अत्यंत महत्त्व आहे. पण वस्तु विकत घ्यायला पैसा नाही. कामच नाही तर कंत्राटदाराला पैसे मागायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देबांधकाम कामगारांची व्यथा : लॉकडाऊनच्या नियमांमुळे इमातींचे बांधकामे ठप्प

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. सोशल डिस्टन्सच्या सूचना असल्याने अनेकांनी अद्याप कामे सुरू केली नाही. त्यामुळे जगायचे कसे या विवंचनेत असणाऱ्या शहरातील सुमारे सहा हजार मजुरांचे हाल होत आहेत.२३ मार्चपासून बांधकामाशी निगडीत कामे बंद करण्यात आली. २२ एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले. पण, नियमांच्या धास्तीने बांधकाम बंद आहेत. शहरातील मजुरांच्या दृष्टीने येथील बुधवारच्या आठवडी बाजाराचे अत्यंत महत्त्व आहे. पण वस्तु विकत घ्यायला पैसा नाही. कामच नाही तर कंत्राटदाराला पैसे मागायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. घरात भाजीपाला, तिखट-मीट नाही, अशी परिस्थिती आहे. रेशन दुकानात धान्य आहे पण ते घेण्यासाठी पैसे नाही. काही मजुरांना कंत्राटदारांनी मदत केली. नंतर मात्र आम्हाला काम द्यावे, अशी मजुरांची मागणी होती. ज्या कंत्राटदारांनी मदत केली नाही त्या मजुरांची स्थिती तर अधिकच बिकट होती. बांधकाम व्यवसायातील गवंडी, टाईल्स लावणारे, इलेक्ट्रीक फिटींग व नळ फिटींग करणारे, वेल्डींग, सुतार, पेटींग काम करणाऱ्या मजुरांची परिस्थितीही वाईट आहे. शहरात सुमारे सात ते आठ हजार मजूर आर्थिक विवंचनेत आहेत.उधारीवरचे जगणेघरी पैसे नसल्याने मुलांच्या गरजा कशा भागवायच्या. इकडून तिकडून उधारीने पैसे मागून दिवस ढकलणे सुरू आहे, अशी व्यथा सुरक्षा नगर येथील ललिता लांबोळे यांनी मांडली. निराधार असूनही बँकेत पैसे जमा झाले नाही, अशी खंत उषा खोबरे यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे शहरातील मजुरांच्या जगण्याचे प्रश्न अधिकाधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम सुरू झाले तरच त्यांच्या हाताला काम मिळू शकेल.कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मजुरांची परिस्थिती हलाखीची आहे. बांधकाम साहित्याचे भाव वाढले. याचा व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. साहजिकच मजुरांना काम नसल्याने सरकारने मदत केली पाहिजे.- सुनील पोटदुखे, बांधकाम व्यावसायिक, भद्रावती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या