शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 10, 2014 23:32 IST

आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प

पाणी प्रश्न तूर्तास टळला : चार दिवसांच्या पावसाने सावरलेचंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासनाची चिंता तूर्तास टळली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी करून चंद्रपूर जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडणाऱ्या वरूणराजाने यावर्षी पावसाळाभर शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच पाऊस पडला. तोही समाधानकारक नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यानंतर आॅगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाची चिन्ह नव्हती. त्यामुळे एरवी या कालावधीत तुडूंब भरली असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात आॅगस्ट महिन्यात निम्माही जलसाठा नव्हता. परिणामी जिल्हा प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले होते. उन्हाळाभर पाणी टिकविण्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, असा बिकट प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस कायम राहिला. त्यामुळे चिंताजनक स्थितीतील जलाशयांना अचानक नवसंजीवनी मिळाली. इरई धरणासह सहा प्रकल्प १०० टक्के भरले. इरई धरणातून सुरक्षेसाठी पाण्याचा विसर्ग केल्यानंतरही ९३.७७ टक्के पाणी आहे. नलेश्वर प्रकल्प, चंदई प्रकल्प, चारगाव प्रकल्प, लभानसराड व दिना प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर आसोलामेंढा प्रकल्पही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात ८१.४२ टक्के जलसाठा आहे. याशिवाय घोडाझरी ५५.१३ टक्के, अमलनाला ६७.८६ टक्के, पकडीगुड्डम ५५.०१ टक्के व डोंगरगाव प्रकल्प ७७.७९ टक्के भरला आहे. याशिवाय नदी-नाल्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने तुर्तास जिल्ह्यावर घोंघावणारे पाणी संकट दूर झाले आहे.(शहर प्रतिनिधी)