शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 10, 2014 23:32 IST

आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प

पाणी प्रश्न तूर्तास टळला : चार दिवसांच्या पावसाने सावरलेचंद्रपूर : आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासनाची चिंता तूर्तास टळली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी करून चंद्रपूर जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडणाऱ्या वरूणराजाने यावर्षी पावसाळाभर शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच पाऊस पडला. तोही समाधानकारक नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करीत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यानंतर आॅगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाची चिन्ह नव्हती. त्यामुळे एरवी या कालावधीत तुडूंब भरली असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात आॅगस्ट महिन्यात निम्माही जलसाठा नव्हता. परिणामी जिल्हा प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले होते. उन्हाळाभर पाणी टिकविण्यासाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, असा बिकट प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस कायम राहिला. त्यामुळे चिंताजनक स्थितीतील जलाशयांना अचानक नवसंजीवनी मिळाली. इरई धरणासह सहा प्रकल्प १०० टक्के भरले. इरई धरणातून सुरक्षेसाठी पाण्याचा विसर्ग केल्यानंतरही ९३.७७ टक्के पाणी आहे. नलेश्वर प्रकल्प, चंदई प्रकल्प, चारगाव प्रकल्प, लभानसराड व दिना प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर आसोलामेंढा प्रकल्पही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात ८१.४२ टक्के जलसाठा आहे. याशिवाय घोडाझरी ५५.१३ टक्के, अमलनाला ६७.८६ टक्के, पकडीगुड्डम ५५.०१ टक्के व डोंगरगाव प्रकल्प ७७.७९ टक्के भरला आहे. याशिवाय नदी-नाल्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने तुर्तास जिल्ह्यावर घोंघावणारे पाणी संकट दूर झाले आहे.(शहर प्रतिनिधी)