शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

साहेब, तुम्हीच म्हणाल ‘ट्रेनला प्रवासी मिळत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.  या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी भविष्यात नियमित ट्रेन सुरु करण्याची वेळ आल्यास प्रवासी मिळत नसल्याची ओरड अधिकारी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशाह - मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस कोरोना संकटापासून बंद आहे. ती आजही सुरु झाली नाही. परिणामी येथील प्रवाशांना मुंबईला जाणे कठीण झाले आहे. दरम्यान, रेल्वे विभागाने मुंबईला जाण्यासाठी बल्लारशाह - एलटीटी ही साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन सुरु केली आहे. मात्र, या ट्रेनचा शेगाव, मनमाळ, जळगाव आदी ठिकाणी स्टाॅप नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.  या ट्रेनला स्टाॅप दिले नसल्याने प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी भविष्यात नियमित ट्रेन सुरु करण्याची वेळ आल्यास प्रवासी मिळत नसल्याची ओरड अधिकारी करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेगाव, शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, समर स्पेशल ट्रेनला शेगाव, मनमाळ आणि जवळगाव येथे स्टाॅप दिले नाहीत. त्यामुळे ट्रेन असूनही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे स्टॉप देऊन आठवड्यातून किमान तीन दिवस ट्रेन चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.-श्रीनिवास सुंचूवारझेडआरयुसीसी सदस्य, चंद्रपूर

सेवाग्राम अजूनही बंदच

औद्योगिक जिल्हा असल्याने चंद्रपूर ते मुंबई असा प्रवास करणारे बरेच प्रवासी आहेत. मात्र, कोरोना संकटापासून सेवाग्राम ही मुंबईला जाण्यासाठी असलेली हक्काची ट्रेन बंद करण्यात आली. 

शेगाव, मनमाळ, जळगावला थांबा द्यामुंबईला जाण्यासाठी थेट ट्रेन नसल्याने रुग्णांचेही बेहाल होत आहेत. दरम्यान, यावर उपाय म्हणून बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनल (साप्ताहिक) ट्रेन दर बुधवारी सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन बुधवारी १२ वाजताच्या सुमारास बल्लारशाह येथे पोहोचत असून, बुधवारीच १.४० वाजता मुंबईसाठी निघते. मात्र, या ट्रेनला शेगाव, मनमान, जवळगाव येथे स्टाॅप देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेगाव, शिर्डी, जळगाव येथे जाणाऱ्या प्रवाशांनी काय करावे, हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, शेगाव, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, ट्रेनच नसल्याने त्यांनासुद्धा जाता येत नाही. विशेष म्हणजे, सेवाग्राम ट्रेन सुरु असताना या स्ट्राॅपवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करीत होती. आता रेल्वेने नियमित ट्रेन सुरु करण्याचा  विचार केल्यास प्रवासीच मिळत नसल्याचे कारण अधिकारी देऊ शकतात. शेगाव, मनमाळ, जळगाव येथे समर स्पेशल ट्रेनचा स्टाॅप देण्याची मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे