शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Corona Virus in Chandrapur; साहेब, आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:12 IST

रोजगाराच्या शोधात दोन महिन्यापूर्वी गोवरी येथे आलेले मजूर राज्यात संचारबंदी असल्याने येथे अडकल्याने त्यांचा सध्यातरी गावाला जाण्याचा मार्ग धूसर झाला असून साहेब,आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......असा आर्त टाहो या मजुरांनी प्रशासनाला केला आहे.

ठळक मुद्देमजुरांचा प्रशासनाला आर्त टाहोतेलंगणातील मजूर अडकले गोवरी गावात

प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर: रोजगाराच्या शोधात दोन महिन्यापूर्वी गोवरी येथे आलेले मजूर राज्यात संचारबंदी असल्याने येथे अडकल्याने त्यांचा सध्यातरी गावाला जाण्याचा मार्ग धूसर झाला असून साहेब,आम्हाला आमच्या गावाला पोहचवा ना......असा आर्त टाहो या मजुरांनी प्रशासनाला केला आहे.पोटासाठी माणसाला कुठेही जाऊन काम करावे लागते,दोन वेळेच्या भाकरीसाठी माणसाला धडपड करावी लागते.भगवान भटलाडे,मनीषा भटलाडे,भानुदास जिव्हारे,चौतराबाई जिव्हारे सर्व रा.रुपापुर जि.आदिलाबाद(तेलंगणा) व सुशीलाबाई कांबळे,वैष्णवी कांबळे,मनीषा कांबळे सर्व.रा.पल्लेझरीता.जिवती जि.चंद्रपूर हे सर्व मजूर कामाच्या शोधात दोन महिन्यापूर्वी राजुरा तालुक्यातील गोवरी येथे आले होते. संचारबंदीमुळे शेतातील कामे अडली असली तरी शेतातील मजुरांची बहुतांश कामे आता आटोपली आहे.मजूर गावाला जाण्याच्या तयारीत असताना अचानक कोरोना संसगार्ने थैमान घातले असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये धडकताच महाराष्ट्रात या रोगांचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे शासनाने राज्यात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.या पार्श्वभूमीवर रोजगारांच्या शोधात आलेले मजूर राजुरा तालुक्यातील गोवरी येथे अडकले आहे.यातील भगवान भटलाडे, मनीषा भटलाडे,भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे हे ४ मजूर तेलंगणा राज्यातील रा.रूपापुर जि.आदिलाबाद येथील आहे तर जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील सुशीला कांबळे,मनीषा कांबळे,वैष्णवी कांबळे या तीनही मायलेकी रोजगाराच्या शोधात आल्या होत्या.परंतु आता राज्यात संचारबंदी लागू झाल्याने त्यांना आपल्या गावाची वाटच धूसर झाली आहे.घरची मंडळी आपल्या परिवारातील सदस्य घरी यावी म्हणून आतुरतेने वाट बघत आहे.या मजुरकडील आता जीवनावश्यक वस्तू संपल्यात जमा आहे.हे मजूर या ठिकाणी पुन्हा काही दिवस राहिले तर त्यांच्या दोन वेळेच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे.सध्या हे सर्व मजूर गोवरी येथील भाऊराव रणदिवे यांचे शेतात आपला संसार थाटून राहत आहे.रणदिवे त्यांचा मुलगा अमित रणदिवे आणि मोरेश्वर रणदिवे यांनी या आलेल्या सर्व मजुरांना सामाजिक बांधिलकी म्हणून राहण्याची सोय करून दिली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यासह जिल्हा व गावाच्या सीमा नागरिकांनी बंद केल्या आहेत.त्यामुळे या मजुरांचा स्वगावी जाण्याचा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाने आम्हाला आमच्या गावाला पोहचवून देण्याची व्यवस्था करून द्यावी अशी आर्त मागणी या मजुरांनी प्रशासनाला केली आहे. साहेब,आम्हाला आमच्या गावी पोहचवा ना.....हा मजुरांचा आर्त टाहो प्रशासनालाही सुन्न करणारा आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस